शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

बुलडाणा : बोंडअळीने झालेल्या नुकसानाचा शेतकर्‍यांना मोबदला द्या - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:58 IST

बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देबोगस बियाणे निर्मिती करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बोगस बिटी बियांण्यांमुळे हा प्रकार घडला असून,  शेतकर्‍यांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करत मोबदला म्हणून त्यांच्याकडून व सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, १९ डिसेंबर रोजी शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर खा. प्रतापराव जाधव यांनी मागण्या मांडत पांढर्‍या सोन्याची अर्थात कापसामुळे निर्माण झालेल्या शेतकर्‍यांच्या जीवनातील  काळी बाजू मांडली. यावेळी खा. जाधव म्हणाले की,  बिटी बियाण्यांवर अळीचा हल्ला होऊ नये म्हणून आवश्यक जीन्स त्यात टाकले जातात; मात्र असे असतानाही जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा बोंडअळीच्या हल्ल्याने हंगाम हिरावल्या जात आहे. पाच ते सात  फुटापर्यंत कपाशी वाढली. बोंडांची संख्या नेहमीपेक्षा दीडपट असल्याने उत्पन्नाची आशाही शेतकर्‍यांना होती; मात्र पांढर्‍या सोन्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. १00 क्विंटलच्या आसपास उत्पादन देणार्‍या शेतामधून १0 क्विंटलही कापूस होऊ शकला नाही. बिटी कॉटनचे बियाणे निर्माण करणार्‍या कंपन्यासोबत अँग्रीमेंटही शेतकर्‍यांनी केले होते. तरीही कापसाच्या उत्पादनात म्हणता येईल, असा खास नफा दिसून आलेला नाही. एका अंदाजानुसार ५0 ते ८0 टक्के कापसाच्या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. कपाशीच्या या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांची नाराजी बियाणे विक्री करणार्‍या आणि त्यासंबधी अँग्रीमेंट करणार्‍या कंपन्यांबाबत आहे. शेतकर्‍यांजवळ बियाणे खरेदी रेकॉर्ड, रिकाम्या बियाण्यांच्या थैल्या व इतर सहायक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सरकारी आर्थिक मदत मिळण्यास त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील आणि खासकरून विदर्भातील गुलाबी बोंडअळीच्या या हल्ल्यापासून बचावासाठी बिटी कॉटन बियाणे उपलब्ध करणारे दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच या कंपन्यांकडून व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना मोबदला मदत म्हणून देण्यात यावा, अशी मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाcottonकापूस