शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : सैलानी यात्रेत स्वच्छतेवर करावे लागणार लक्ष केंद्रित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:04 IST

बुलडाणा : शतकोत्तर धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासलेल्या सैलानी यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविकांची होणारी गर्दी आणि गारपिटीमुळे बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य तापाची साथ पाहता आरोग्य विभागावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मुद्दयावर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला सजग रहावे लागणार आहे.

ठळक मुद्देवातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगाची शक्यता आरोग्य विभागासमोर आव्हान 

सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शतकोत्तर धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासलेल्या सैलानी यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविकांची होणारी गर्दी आणि गारपिटीमुळे बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य तापाची साथ पाहता आरोग्य विभागावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मुद्दयावर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला सजग रहावे लागणार आहे. जैविक कचर्‍याचाही येथे मोठा प्रश्न आहे.  त्यानुषंगाने पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून येथे निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. सैलानी बाबा यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. सर्वधर्मिय लाखो भाविक दरवर्षी सैलानी बाबांच्या मजारवर माथा टेकविण्यासाठी येतात. सात ते आठ लाख भाविकांची गर्दी लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीने  प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे  वातावरणात झालेला बदल  पाहता साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने सजग राहण्याची गरज आहे.  यात्रेत नवस बोलल्या जात असल्याने येथे पशुबळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे येथे होणारी गर्दी पाहता जैविक कचर्‍याचाही प्रश्न उद् भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दूषित पाण्याची समस्या सैलानी यात्रेत दुषीत पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे. खासगी विहिरी व टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण केलेले नसल्यामुळे आजार उदभवू शकतात. तसा जुना अनुभव आहे. आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यावर्षी यात्रा महोत्सव मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात आहे. ऋतू बदलाचा हाच नेमका काळ आहे. त्यामुळे या बदलाचाही मानवी आरोग्यावर परिणाम होऊन रुग्णांची संख्या येथे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शौचालयाची सोय हवी! एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियानाचा नारा लावत असताना सैलानीत येणार्‍या भाविकांसाठी शौचालयाची व्यवस्था केलेली नसते. त्यामुळे त्यांना उघडयावरच नैसर्गिक विधी उरकावे लागतात. डोंगराच्या कडेला एकीकडे महिला तर दुसरीकडे पुरुष शौचाला बसतात. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. वातावरणात पसरलेल्या दुर्गंधीचा त्रास  स्थानिकांना यात्रा संपल्यावर पुढचा महिनाभर सहन करावा लागतो. यामधूनही साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. सैलानी बाबा ट्रस्ट व प्रशासनाकडून फिरते शौचालय उभारणे आवश्यक आहे.

सैलानी यात्रेत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज असून यात्रा परिसरात निर्जंतुकीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. सोबतच यात्रेत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी यात्रेत येणार्‍या प्रत्येक रस्त्यावरील चेक पॉईंटवर पाणीपुरवठा करणारे टँकर व वाहनांमधील पाण्याची ओटी टेस्ट करूनच यात्रेत त्यांना प्रवेश देण्यात येईल. यात्रा महोत्सवाच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज आहे.-डॉ. प्रशांत बढे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा