शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By संदीप वानखेडे | Updated: August 7, 2022 00:01 IST

सवडद येथील घटना; साेयाबीन, कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव

संदीप वानखडे/ साखरखेर्डा (बुलडाणा): निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षीपासून नुकसान हाेत आहे, त्यातच कपाशी आणि साेयाबीन पडलेल्या अळ्यांवर नियंत्रण येत नसल्याचे हतबल झालेल्या ४० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सवडद येथे ६ ऑगस्ट राेजी सायंकाळी ७ वाजता घडली. मुरलीधर नरसिंहराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सवडद येथील मुरलीधर देशमुख यांच्याकडे १० एकर शेती आहे, त्यांनी यावर्षी शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली आहे. वातावरणात दमटपणा वाढवल्यामुळे सध्या सोयाबीन व कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून फवारणी करूनही सोयाबीनवरील अळी आटोक्यात येत नसल्याने ते हतबल झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे तण वाढले आहे, मागील वर्षीही शेती खरडून गेली होती, त्याचाही मोबदला मिळाला नाही. पीक विम्याचे पैसेही मिळत नाही. या विवंचनेत मुरलीधर देशमुख हाेते. अखेर त्यांनी शनिवारी सायंकाळी शेतातून घरी परत आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या