शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बुलडाणा जिल्ह्याती अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:18 IST

बुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका वर्गाची निवड एनसीईआरटीने रॅण्डम पद्धतीने केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री चालणार्‍या अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार आहे.

ठळक मुद्देनॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे विद्यार्थ्यांची रॅण्डम पद्धतीने निवड

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका वर्गाची निवड एनसीईआरटीने रॅण्डम पद्धतीने केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री चालणार्‍या अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार आहे.शासन निर्णयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांचे फलित काय, हे तपासण्यासाठी शासनाने सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्याला एनएएस (नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे) हे नाव देण्यात आले आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवडलेल्या वर्गातील ३0 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीत बहुपर्यायी प्रश्न राहणार आहेत. १0 वीसाठी भाषा, गणित व पर्यावरण शाळा, सामाजिकशास्त्र या चार विभागातील ६0 प्रश्न राहणार आहे. दोन तासांची वेळ दिली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी जिल्हा स्तरावर डीएमयूची रचना करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. हे पथक चाचणी सुरू असताना कोणत्याही शाळेला भेट देणार आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील ८0 शाळांची निवडनॅशनल अचिव्हमेंट सर्वेसाठी राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील ८0 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील १0, चिखली ९, देऊळगाव राजा ५, जळगाव जामोद ४, खामगाव १0, लोणार ५, मलकापूर ५, मेहकर ९, मोताळा ४, नांदूरा ६, संग्रामपूर ३, शेगाव ५ व सिंदखेड राजा तालुक्यातील ५ अशा एकूण ८0 शाळांची निवड करण्यात आली आहे.

चाचणीसाठी शासकीय स्तरावरून एक पर्यवेक्षकचाचणी घेण्यासाठी प्रत्येक शाळेत शासकीय स्तरावरून एक पर्यवेक्षक दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकीटसुद्धा परीक्षेच्यावेळी शासकीय पर्यवेक्षकांसमोरच उघडायचे आहे. त्यावर पर्यवेक्षक व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यावी लागेल. वर्गातील ३0 विद्यार्थ्यांची चाचणी होणार असली तरी त्यादिवशी १00 टक्के विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी शाळेवर टाकण्यात आली आहे. चाचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी निळा किंवा काळा बॉलपेनचा वापर करायचा आहे. निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पर्यवेक्षकांकडे द्यावे लागणार आहे.

उत्तर पत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्य स्तरावर जाणारचाचणी झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्य स्तरावर जाणार आहेत. राज्य स्तरावर ओएमआर पद्धतीने तपासणी होऊन तालुकानिहाय निकाल एनअेएसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निकालावरून तालुक्यांची तुलना करता येईल.  या निकालावरून कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा