शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बुलडाण्यातील पतसंस्था फेडरेशन करणार सांगली जिल्ह्यातील पाच गावांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 11:54 IST

सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील बेलवडी, वसवडे, ब्रम्हनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावे पुनर्वसनासाठी घेण्याचे ठरले आहे.

बुलडाणा: बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ अतिवृष्टीमुळे वाताहत झालेल्या सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही माहिती दिली.पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली. आपत्तीतून सावरण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. परंतू तेवढ्या मदतीने तेथील लोकांना सावरणे शक्य नाही. समाजातून मोठ्या प्रमाणात हातभार लागणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ यांनी तातडीची सभा बोलावून या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील बेलवडी, वसवडे, ब्रम्हनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावे पुनर्वसनासाठी घेण्याचे ठरले आहे. पुनर्वसनाचे काम येत्या दोन ते तीन दिवसात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनात सुरु होईल. या कामात जास्तीत जास्त पतसंस्थांनी सहभाग नोंदवावा व रोख स्वरुपात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदतीची रक्कम महाराष्ट्र राज्य फेडरेशन किंवा बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी संस्थांचे फेडरेशन यांच्याकडे पाठवावी, असे आवाहन बुलडाणा जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. या सभेस अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाध्यक्षा स्वाती वाकेकर, मानद सचिव सुरेंद्र पांडे, संचालक अ‍ॅड. मंगेश व्यवहारे, देवानंद कायंदे, पंडीतराव देशमुख, शाम नसवाले, गोविंद मापारी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangli Floodसांगली पूर