शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:50 IST

बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची घोषणा टंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भूजल अधिनियम लागू

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे ५00 मीटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहिरीचे खोदकाम करणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीमय करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

भीषण पाणी टंचाईची दाहकता; पाणी भरताना महिला विहिरीत पडलीसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्याच्या शोधासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव येथे पाणी भरत असताना एक महिला विहिरीत पडली असताना तिचे चार युवकांनी प्राण वाचविले असून, उपरोक्त घटना २१ ला घडली. सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, त्यापैकी ५0 हून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोरेगाव, उमनगाव, सावंगी भगत यासह ८ गावात टँकरने पाणी पुरवठा होत असून, ४0 हून अधिक गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. पाण्याची दाहकता एवढी भयानक आहे की पाण्यासाठी रात्र जागून प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई असून, येथे टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. दिवसातून दोन वेळा एक टँकर फेर्‍या मारते. ग्राम पंचायतसमोरील आणि मंदिरामागील विहिरीत पाणी टाकल्या जाते. २१ ला दुपारी गावात टँकर आले असता पाणी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी उसळते. ग्रामपंचायतसमोर टँकर उभे राहिले आणि विहिरीत पाणी सोडत असताना धारेखाली हंडा भरावा म्हणून महिलांची चढाओढ लागली. या धामधुमीत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गवई यांची बहीण कौसल्याबाई इंगळे पाणी भरण्यासाठी आल्या. पाणी भरत असताना त्यांचा तोल जावून त्या विहिरीत पडल्या. लागलीच गोंधळ उडाल्याने तेथे उपस्थित सुरेश कव्हळे, अनिल मोरे, सिराज पठाण, बाळू गवई यांनी कौसल्याबाईला वाचविण्यात यश आले. जखमी कौसल्याबाईला विहिरीतून बाहेर काढून तत्काळ साखरखेर्डा येथील दवाखान्यात आणून उपचार केले. त्या महिलेचे प्राण वाचविणार्‍या युवकांचे सर्वांनी कौतुक केले. उपरोक्त घटना घडली असताना ग्रामपंचायतमध्ये सचिवासह कर्मचारी हजर होते. त्यांची पाणी वितरणाची जबाबदारी असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अनेकांनी रोष व्यक्त केला. सावंगीभगत सारखी वितरण व्यवस्था इतर गावांनी बजावली तर गोरेगावसारखा प्रसंग निर्माण होणार नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater shortageपाणीटंचाई