शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:50 IST

बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची घोषणा टंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भूजल अधिनियम लागू

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे ५00 मीटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहिरीचे खोदकाम करणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीमय करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

भीषण पाणी टंचाईची दाहकता; पाणी भरताना महिला विहिरीत पडलीसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्याच्या शोधासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव येथे पाणी भरत असताना एक महिला विहिरीत पडली असताना तिचे चार युवकांनी प्राण वाचविले असून, उपरोक्त घटना २१ ला घडली. सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, त्यापैकी ५0 हून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोरेगाव, उमनगाव, सावंगी भगत यासह ८ गावात टँकरने पाणी पुरवठा होत असून, ४0 हून अधिक गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. पाण्याची दाहकता एवढी भयानक आहे की पाण्यासाठी रात्र जागून प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई असून, येथे टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. दिवसातून दोन वेळा एक टँकर फेर्‍या मारते. ग्राम पंचायतसमोरील आणि मंदिरामागील विहिरीत पाणी टाकल्या जाते. २१ ला दुपारी गावात टँकर आले असता पाणी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी उसळते. ग्रामपंचायतसमोर टँकर उभे राहिले आणि विहिरीत पाणी सोडत असताना धारेखाली हंडा भरावा म्हणून महिलांची चढाओढ लागली. या धामधुमीत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गवई यांची बहीण कौसल्याबाई इंगळे पाणी भरण्यासाठी आल्या. पाणी भरत असताना त्यांचा तोल जावून त्या विहिरीत पडल्या. लागलीच गोंधळ उडाल्याने तेथे उपस्थित सुरेश कव्हळे, अनिल मोरे, सिराज पठाण, बाळू गवई यांनी कौसल्याबाईला वाचविण्यात यश आले. जखमी कौसल्याबाईला विहिरीतून बाहेर काढून तत्काळ साखरखेर्डा येथील दवाखान्यात आणून उपचार केले. त्या महिलेचे प्राण वाचविणार्‍या युवकांचे सर्वांनी कौतुक केले. उपरोक्त घटना घडली असताना ग्रामपंचायतमध्ये सचिवासह कर्मचारी हजर होते. त्यांची पाणी वितरणाची जबाबदारी असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अनेकांनी रोष व्यक्त केला. सावंगीभगत सारखी वितरण व्यवस्था इतर गावांनी बजावली तर गोरेगावसारखा प्रसंग निर्माण होणार नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater shortageपाणीटंचाई