शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:50 IST

बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची घोषणा टंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भूजल अधिनियम लागू

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे ५00 मीटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहिरीचे खोदकाम करणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीमय करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

भीषण पाणी टंचाईची दाहकता; पाणी भरताना महिला विहिरीत पडलीसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्याच्या शोधासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव येथे पाणी भरत असताना एक महिला विहिरीत पडली असताना तिचे चार युवकांनी प्राण वाचविले असून, उपरोक्त घटना २१ ला घडली. सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, त्यापैकी ५0 हून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोरेगाव, उमनगाव, सावंगी भगत यासह ८ गावात टँकरने पाणी पुरवठा होत असून, ४0 हून अधिक गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. पाण्याची दाहकता एवढी भयानक आहे की पाण्यासाठी रात्र जागून प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई असून, येथे टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. दिवसातून दोन वेळा एक टँकर फेर्‍या मारते. ग्राम पंचायतसमोरील आणि मंदिरामागील विहिरीत पाणी टाकल्या जाते. २१ ला दुपारी गावात टँकर आले असता पाणी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी उसळते. ग्रामपंचायतसमोर टँकर उभे राहिले आणि विहिरीत पाणी सोडत असताना धारेखाली हंडा भरावा म्हणून महिलांची चढाओढ लागली. या धामधुमीत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गवई यांची बहीण कौसल्याबाई इंगळे पाणी भरण्यासाठी आल्या. पाणी भरत असताना त्यांचा तोल जावून त्या विहिरीत पडल्या. लागलीच गोंधळ उडाल्याने तेथे उपस्थित सुरेश कव्हळे, अनिल मोरे, सिराज पठाण, बाळू गवई यांनी कौसल्याबाईला वाचविण्यात यश आले. जखमी कौसल्याबाईला विहिरीतून बाहेर काढून तत्काळ साखरखेर्डा येथील दवाखान्यात आणून उपचार केले. त्या महिलेचे प्राण वाचविणार्‍या युवकांचे सर्वांनी कौतुक केले. उपरोक्त घटना घडली असताना ग्रामपंचायतमध्ये सचिवासह कर्मचारी हजर होते. त्यांची पाणी वितरणाची जबाबदारी असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अनेकांनी रोष व्यक्त केला. सावंगीभगत सारखी वितरण व्यवस्था इतर गावांनी बजावली तर गोरेगावसारखा प्रसंग निर्माण होणार नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater shortageपाणीटंचाई