शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बुलडाणा : तूर घोटाळ्याच्या तपासाला मिळेना गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:19 IST

वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.

ठळक मुद्देसहा महिने उलटूनही आरोपी मोकाटच!

वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.तीन महिन्यांपूर्वी तूर घोटाळा उघडकीस येऊन यामध्ये एकूण २0 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात ७  व्यापार्‍यांचा समावेश असून, उर्वरित आरोपी खविसंचे विद्यमान संचालक आहेत. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर शासनाने तूर घोटाळ्याची चौकशी केली. यातून गंभीर स्वरूपाचे किस्सेदेखील बाहेर आले. यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी खामगाव न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. धिम्या गतीने तपास सुरू असल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप यातील तक्रारकर्ते प्रशांत डिक्कर, संचालक  मोहन पाटील यांनी केला आहे. सदर तूर घोटाळ्याचा तपास मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असून, त्यांनी घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे खविसंकडून जप्त केल्याची माहिती आहे.असे असताना सदर माहिती न्यायालयात सादर करणे गरजेचे आहे. तरच यातील आरोपींना धडा शिकवला जाऊ शकतो. एक-दोन एकर शेती नावाने असताना शेकडो क्विंटल तूर कशी विकली, ज्यांनी तूरच पेरली नव्हती, त्यांनी तूर विकली. काहींनी तूर न विकताही खविसंतून धनादेश नेले अशा गंभीर बाबी चौकशीतून समोर आल्या आहेत.ही शासन व जनतेची फसवणूक नाही काय, असा सवाल शेतकरी  करीत आहेत. शासनाने नाफेड अंतर्गत तूर खरेदी योजना राबविली; पण या योजनेचा खरा मलिदा व्यापार्‍यांनीच लाटला. ही सर्व वस्तुस्थिती असताना तपास अधिकारी मात्र चौकशीच्या नावाखाली कारवाई पुढे-पुढे ढकलत आहेत. या घोटाळ्यामुळेच खविसंचे संचालक मंडळ बरखास्त करावे, असे शासनाचे निर्देश असतानाही सहकार अधिकारी श्रेणी-१ कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे.

नवीन हंगाम येऊन ठेपला तरी कारवाई नाहीतूर खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे; पण मागील हंगामातील घोटाळ्याचा तपास अजून पूर्ण नाही. आरोपींना जमानतींकरिता वेळ दिला जात असून, जनतेचे लक्ष या कारवाईकडे लागलेले आहे.