शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बुलडाणा : तूर घोटाळ्याच्या तपासाला मिळेना गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:19 IST

वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.

ठळक मुद्देसहा महिने उलटूनही आरोपी मोकाटच!

वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.तीन महिन्यांपूर्वी तूर घोटाळा उघडकीस येऊन यामध्ये एकूण २0 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात ७  व्यापार्‍यांचा समावेश असून, उर्वरित आरोपी खविसंचे विद्यमान संचालक आहेत. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर शासनाने तूर घोटाळ्याची चौकशी केली. यातून गंभीर स्वरूपाचे किस्सेदेखील बाहेर आले. यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी खामगाव न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. धिम्या गतीने तपास सुरू असल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप यातील तक्रारकर्ते प्रशांत डिक्कर, संचालक  मोहन पाटील यांनी केला आहे. सदर तूर घोटाळ्याचा तपास मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असून, त्यांनी घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे खविसंकडून जप्त केल्याची माहिती आहे.असे असताना सदर माहिती न्यायालयात सादर करणे गरजेचे आहे. तरच यातील आरोपींना धडा शिकवला जाऊ शकतो. एक-दोन एकर शेती नावाने असताना शेकडो क्विंटल तूर कशी विकली, ज्यांनी तूरच पेरली नव्हती, त्यांनी तूर विकली. काहींनी तूर न विकताही खविसंतून धनादेश नेले अशा गंभीर बाबी चौकशीतून समोर आल्या आहेत.ही शासन व जनतेची फसवणूक नाही काय, असा सवाल शेतकरी  करीत आहेत. शासनाने नाफेड अंतर्गत तूर खरेदी योजना राबविली; पण या योजनेचा खरा मलिदा व्यापार्‍यांनीच लाटला. ही सर्व वस्तुस्थिती असताना तपास अधिकारी मात्र चौकशीच्या नावाखाली कारवाई पुढे-पुढे ढकलत आहेत. या घोटाळ्यामुळेच खविसंचे संचालक मंडळ बरखास्त करावे, असे शासनाचे निर्देश असतानाही सहकार अधिकारी श्रेणी-१ कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे.

नवीन हंगाम येऊन ठेपला तरी कारवाई नाहीतूर खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे; पण मागील हंगामातील घोटाळ्याचा तपास अजून पूर्ण नाही. आरोपींना जमानतींकरिता वेळ दिला जात असून, जनतेचे लक्ष या कारवाईकडे लागलेले आहे.