शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बुलडाणा : पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:32 IST

बुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेडसह १२ गावाचे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक कडाळे यांना शुक्रवारी घेराव घातला. यावेळी चर्चेअंती चालू बिल भरून बारा गाव पाणी पुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देविजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेड परिसरातील ग्रामस्थांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेडसह १२ गावाचे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक कडाळे यांना शुक्रवारी घेराव घातला. यावेळी चर्चेअंती चालू बिल भरून बारा गाव पाणी पुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.या योजनेत मोताळा तालुक्यातील राजूर, रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, काबरखेड, हनवतखेड, तपोवन, काळेगाव, पोखरी, फर्दापूर या दुष्काळग्रस्त गावांचा समावेश असून, आता उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची समस्या भयावह आहे. सदर बारा गावच्या सरपंचांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सतत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही वीज पुरवठा सुरू झाला नाही. ही समस्या लक्षात घेता विजयराज शिंदे यांनी बारा गावच्या सरपंच व प्रतिनिधी समवेत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कडाळे यांच्या कार्यालयात कडाळे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरनचे कार्यकारी अभियंता रबडे यांना घेराव घालून या संबंधी जाब विचारला. सविस्तर चर्चा करून सदर वीज बिल चा भरणा करण्याची गरज असल्याने तात्पुरता चालू वीज बिल भरणा ग्रामपंचायतीने करावा व उर्वरित भरणा म.जी.प्रा.ने शासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करून त्वरित करावा, अशा प्रकाराच्या यशस्वी तोडगा काढला. यावर सहमती दर्शवत अधीक्षक अभियंता यांनी चालू वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतींकडून करून घेऊन वीज कनेक्शन  तात्काळ सुरू करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या. याची फलश्रुती म्हणजे पुढील २४ तासात हे वीज कनेक्शन तात्काळ सुरू करण्यात आले. यावेळी विजयराज शिंदे यांच्यासह त्यांच्या समवेत बारा गावचे सरपंच, माधव शिराळ, दिगंबर पवार, राजू पाटील, दिलीप पाटील, सोपान खोटाडे, दादाराव पाटील, ईश्वर शिंदे व इतर ग्रामस्थ तथा ओमसिंग राजपूत, राजू गायकवाड, उद्धव भोंडे, अविनाश शेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vijayraj Shindeविजयराज शिंदेbuldhanaबुलडाणा