शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बुलडाणा : कंत्राटी कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात; आंदोलनाचा इशारा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:29 IST

बुलडाणा:   कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन लाखाहून अधिक कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात शासनाच्या १४ विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देनवीन निर्णय अन्यायकारक ३ लाख कर्मचार्‍यांची अडचण

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:   कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन लाखाहून अधिक कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात शासनाच्या १४ विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.शासनाच्या विविध विभागात मोठय़ा प्रमाणात कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर व विविध प्रकारची कामे सन १९९५-९६ पासून करीत आहेत. अशा कर्मचार्‍यांची संख्या राज्यात जवळपास तीन लाखाहून जास्त आहे. त्यांच्याकडून शासन १२ महिन्याचा करार करून घेत होती, तर कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी न्यायालयात केले होते. दरम्यान, शासनाकडून कंत्राटी कर्मचार्‍यांचा ११ महिन्यांचा करार करण्यात आला. तर काही विभागातील कर्मचार्‍यांचा ६ महिन्यांचा करार करण्यात आला; मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांकडून नियमित कर्मचार्‍यांपेक्षा जास्त कामे करून घेण्यात येत असूनही त्यांना नियमित कर्मचार्‍यांपेक्षा ३0 ते ४0 टक्के कमी मानधन देण्यात येत आहे. या अन्यायाविरुद्ध व कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित नियुक्ती देण्याचा मागणीसाठी कंत्राटी कर्मचार्‍यांच्या विविध संघटनेतर्फे मागणी होऊ लागली. मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी २0१८ रोजी शासन निर्णयाचा आध्यादेश काढून राज्यातील तीन लाखाहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांचा व्यावसायिक भवितव्याबाबत घेतलेला अन्यायकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, सदर शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणी लवकरच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहे. कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

या विभागातील कर्मचार्‍यांचा समावेशकंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, वसुंधरा पाणलोट विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलस्वराज, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, भूजल विभाग,  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना यांचा समावेश आहे.

शासनाने ९ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आयोजित आंदोलनात सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे.- रवींद्र राऊत जिल्हाध्यक्ष, सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा