शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

बुलडाणा : निरंतर शिक्षणांतर्गत परिचारिकांची आर्थिक लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:15 IST

बुलडाणा :  ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत परिचारिकांना गरज नसताना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वर्षातून तीन वेळा असे एकूण पाच वर्षांत १५ निरंतर शिक्षण (सीएनई) घेऊन २५ गुणांची सक्ती करण्यात आली आहे. या  शिक्षणासाठी एका वेळेस जवळपास ८०० रुपये खर्च येत असून, याद्वारे प्रशिक्षण देणाºया खासगी संख्या परिचारिकांची आर्थिक लूट करीत असल्याची भावना परिचारिकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जवळपास पाच हजार परिचारिका आहेत.

ठळक मुद्देनोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सक्ती प्रशिक्षणाबाबत परिचारिकांची नाराजी

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत परिचारिकांना गरज नसताना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वर्षातून तीन वेळा असे एकूण पाच वर्षांत १५ निरंतर शिक्षण (सीएनई) घेऊन २५ गुणांची सक्ती करण्यात आली आहे. या  शिक्षणासाठी एका वेळेस जवळपास ८०० रुपये खर्च येत असून, याद्वारे प्रशिक्षण देणाºया खासगी संख्या परिचारिकांची आर्थिक लूट करीत असल्याची भावना परिचारिकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जवळपास पाच हजार परिचारिका आहेत.महाराष्ट्र परिचर्या परिषदेद्वारे दर पाच वर्षांनी महाराष्ट्रातील शासकीय व खासगी संस्थेमध्ये कार्यरत लाखो परिचारिकांच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात येते.  २०१७ पर्यंत नूतनीकरण शुल्क ३०० रुपये भरून करण्यात येत होते; मात्र २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी व प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी पाच गुण असे पाच वर्षांत २५ गुण सीएनई म्हणजे निरंतर शिक्षण पूर्ण करण्याची जाचक तथा त्रासदायक अट परिचारिकांवर लादण्यात आली आहे. हे  निरंतर शिक्षण नियुक्ती असलेल्या जिल्ह्यापासून जवळपास २०० किलो मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन घेणे आवश्यक आहे. यासाठी परिचारिकांना जवळपास तीन दिवसांचा कालावधी लागत असून, त्यास खर्च ही ८०० रुपयेपेक्षा जास्त येत आहे. या क्षेत्रात ९० टक्के महिला व तरुणी असून, त्यांना आपले गुण पूर्ण करण्यासाठी कुटुंंबाशिवाय दूरच्या शहरात एकटे तसेच मुक्कामी जावे लागत आहे. काही परिचारिका गरोदर अवस्थेत किंवा लहान बाळासोबत निरंतर शिक्षण घेण्यासाठी जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी व गौरसोय निर्माण होत आहेत. अशा प्रकारच्या अडचणींचा सामना राज्यातील लाखो व जिल्ह्यातील जवळपास पाच हजार परिचारिकांना करावा लागत आहे. त्यामुळे खासगी व शासकीय परिचारिकांना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी बंधनकारक सीएनई म्हणजे निरंतर शिक्षण व पाच गुणांच्या अटीविषयी परिचारिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून पिळवणूकखासगी व शासकीय परिचारिकांना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी बंधनकारक सीएनई म्हणजे निरंतर शिक्षण बंधनकारक केले आहे; मात्र एएनएम, आरजीएनएम, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग आदी सर्वच शुश्रूषा संवर्गासाठी एकाच प्रकारचे निरंतर शिक्षण, एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे निरंतर शिक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या विषयांचा व उपरोक्त संवर्गाचा अभ्यासक्रमाचा त्यांच्या कामाशी संबंधित कोणताही ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणाºया संस्था परिचारिकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याची परिचारिकांची ओरड आहे.

खासगी रुग्णालयातील परिचारिकांत नाराजीराज्यात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित परिचारिका बेरोजगार आहेत. तसेच हजारो परिचारिका खासगी आरोग्य संस्था व खासगी रुग्णालयात तुटपुंजा म्हणजे दोन ते तीन हजारांच्या मिळकतीवर रुग्ण सेवा देत आहेत. त्यांना सीएनईवर होणारा खर्चाचा बोजा पेलणे शक्य होत नाही. त्यामुळे या निर्णयाची सहानुभूतीपूर्वक विचार करून नोंदणी प्रमाणपत्रासाठी बंधनकारक केलेली सीएनए व वार्षिक पाच गुणांची अट रद्द करण्यात यावी अथवा शिथिल करण्यात यावी, अशी मागणी आहे.

परिचारिकांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी बंधनकारक केलेली सीएनए व गुणांची अट रद्द करून न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.- मधुबाला साळवे, अध्यक्ष, सार्वजनिक आरोग्यसेवा परिचारिका संघटना, जिल्हा शाखा, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा