शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बुलडाणा जिल्ह्यात खरीपातील उत्पादकता सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:04 IST

कृषी विभागाने खरीपातील उत्पादकतेचा पहिला अनुमान काढला असून यंदा जिल्ह्यात धान्योत्पादन हे सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या समाधानकारक पावसाने वार्षिक सरासरीची पन्नाशी ओलांडली असतानाच कृषी विभागाने खरीपातील उत्पादकतेचा पहिला अनुमान काढला असून यंदा जिल्ह्यात धान्योत्पादन हे सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, असे असले तरी जिल्हयातील प्रकल्पांमध्ये अवघा सात टक्के जलसाठा शिल्लक असल्याने परतीच्या पावसावरच भविष्यातील पाणी आरक्षणाची मदार राहणार असल्याचे चित्र आहे. अद्यापही जिल्हयातील ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे परतीचा पाऊस येत्या काळात कसा बरसतो यावरच खरीपाचे उत्पादन आणि पाणीसमस्येच्या निराकरणाचे गुपीत दडले आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानंतर दोन दिवसात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलै ते १४ आॅगस्ट दरम्यानची पावसाची ओढ पाहता पडलेला हा पाऊस जिल्ह्यातील सहा लाख ९८ हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. कपाशीसह अन्य पिके ही फुलोर्यात तथा फळधारणेच्या स्थिती आलेली असतानाच हा पाऊस पडल्याने कपाशीचे फळ, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका पिकांचे दाणे भरण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यातच खरीपाचा आॅगस्ट महिन्यातील पहिला पूर्वानूमान कृषी विभागाने काढला असून शेतकर्यांच्या दृष्टीने हा अनुमान दिलासादायक आहे. पुढील काळात आणखी तीन अंदाज कृषी अंतर्गत पातळीवर दरवर्षीच्या प्रक्रियेनुसार घेणार आहे. मात्र त्यासाठी परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसणे गरजेचे आहे. अन्यथा सध्या असलेले दिलासादाक चित्र मात्र प्रसंगी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती