शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्याचा पीक नुकसानाचा आकडा गुलदस्त्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:05 IST

Agriculture Buldhana आणखी दोन दिवस हे सर्वे चालणार आहेत. परंतू अद्यापही काही भागात महसूल विभाग पोहचला नसल्याचे दिसून येते. 

ब्रम्हानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन दिवसामध्ये नुकसानाचे सर्वे पूर्ण होत आहेत. या नुकसानाचा आकडा गुलदस्त्यात आहे.  परतीच्या पावसाने यंदा खरीप पीकच पाण्यात गेल्याने शेतकरी संकटात आहेत. मूग, उडीद काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही शेतातील मूग वेचणीच्या कामी पडला नाही. त्यानंतर ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पुन्हा परतीच्या पावसाचा तडाखा बसला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अनेक शेतातील सोयाबीन पिकाला कोंब आले. त्यामुळे शेतकऱ्यांना हिरवी कच्च असलेली सोयाबीन कापूण शेतातच वाळवत ठेवावी लागली. दरम्यान, पावसाने १५ दिवसाची विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला सुरूवात केली. सोयाबीन साेंगणीचा हंगाम जोरात सुरू असताना परतीच्या पावसाचा तडाखा जिल्ह्यात बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोंगूण टाकलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या लावल्या होत्या; परंतू त्यावर पाऊस झाल्याने सोंगलेल्या सोयाबीनचेही नुकसान झाले आहे. सोयाबीन ओली झाल्याने आता मळणीयंत्रातूनही काढता येत नाही. कपाशी पीकही वेचणी करण्यास अडचणी येत आहेत. पांढरा शुभ्र मिळणारा कापूस झाडावरच काळा पडला आहे.  या नुकसानाचे  सर्वेक्षण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आणखी दोन दिवस हे सर्वे चालणार आहेत. परंतू अद्यापही काही भागात महसूल विभाग पोहचला नसल्याचे दिसून येते. 

दोन दिवसात येणार पीक नुकसानाचा अहवालजिल्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी यासह इतर काही पिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन हे पंचनामे करण्यात येत आहेत. आणखी दोन दिवसामध्ये नुकसानाचे पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतरच पीक नुकसानाचा अहवाल येईल. जिल्हा परिषद, महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे हे पंचनामे करत आहे. -नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती