शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:38 IST

कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभर मुक्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झालेला आहे. हा ओलावा रब्बी पिकांसाठी पोषक आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांचा पेरा दुपटीने वाढणार असून अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हा पेरा होणार आहे. कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे.गतवर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन सोयाबीनला शेंगा लागण्याच्या कालावधीतच पावसाने दांडी मारल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. कापसासह सर्वच पिकांना कमी पावसाचा फटका बसला. खरीपप्रमाणेच रब्बी हंगामावरही दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झाला. सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड करण्याचे टाळले. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षी केवळ १ लाख २८ हजार, ६९८ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये गहू १५ हजार ५५४, मका २ हजार ५१७, ज्वारी ८ हजार ४३४, हरभरा १ लाख २ हजार १३० तर ६३ हेक्टर क्षेत्रावर करडीची पेरणी झाली होती. यावर्षी कृषी विभागाच्या वतीने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने सुधारीत नियोजन करण्यात आले आहे. यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टर आहे. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार आहेत. यामुळे आधीच्या नियोजनाच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात जवळपास १ लाख हेक्टरने वाढ होणार असल्याचे चित्र आहे. प्रसंगी त्यापेक्षाही अधिक क्षेत्रावर रब्बीचा पेरा होईल, असे संकेत आहेत. दरम्यान यावर्षी रब्बी ज्वारी १२ हजार ५००, गहू ६६ हजार ५७५, हरभरा १ लाख १२ हजार ६४१, मका ३२ हजार, सुर्यफुल १००, करडई एक हजार तर १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका चारा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी एकुण ८१ हजार ५७५.५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक २० हजार ७५३ तर खासगी ६० हजार ८२२.५ क्विंटलचा समावेश आहे. आतापर्यंत ३९ हजार ७६७ क्विंटलचे आवंटन देण्यात आले आहे. यापैकी प्रत्यक्षात ८ हजार ६७८.४ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे.करडई व सुर्यफुलाचे सर्वात कमी क्षेत्रजिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच १ लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यापाठोपाठ गव्हाच्या पिकाला शेतकरी पसंती दर्शवित आहेत. सूर्यफुलाकडे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. सुर्यफुल पिकाची केवळ १०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. करडई या पिकाला देखील शेतकºयांनी कमीच महत्त्व दिले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर या पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. यावरून करडई व सुर्यफुल या पिकाचे क्षेत्र सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाढीव क्षेत्रानुसार बियाण्यांचे नियोजन करण्याचे निर्देशमागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामातील क्षेत्रात दुपटीने वाढ होणार आहे. यामुळे बियाण्याची गरजदेखील वाढली आहे. शेतकºयांना लागवडीसाठी बियाणे कमी पडणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी बुलडाण्यात कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती