शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:38 IST

कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभर मुक्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झालेला आहे. हा ओलावा रब्बी पिकांसाठी पोषक आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांचा पेरा दुपटीने वाढणार असून अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हा पेरा होणार आहे. कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे.गतवर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन सोयाबीनला शेंगा लागण्याच्या कालावधीतच पावसाने दांडी मारल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. कापसासह सर्वच पिकांना कमी पावसाचा फटका बसला. खरीपप्रमाणेच रब्बी हंगामावरही दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झाला. सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड करण्याचे टाळले. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षी केवळ १ लाख २८ हजार, ६९८ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये गहू १५ हजार ५५४, मका २ हजार ५१७, ज्वारी ८ हजार ४३४, हरभरा १ लाख २ हजार १३० तर ६३ हेक्टर क्षेत्रावर करडीची पेरणी झाली होती. यावर्षी कृषी विभागाच्या वतीने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने सुधारीत नियोजन करण्यात आले आहे. यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टर आहे. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार आहेत. यामुळे आधीच्या नियोजनाच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात जवळपास १ लाख हेक्टरने वाढ होणार असल्याचे चित्र आहे. प्रसंगी त्यापेक्षाही अधिक क्षेत्रावर रब्बीचा पेरा होईल, असे संकेत आहेत. दरम्यान यावर्षी रब्बी ज्वारी १२ हजार ५००, गहू ६६ हजार ५७५, हरभरा १ लाख १२ हजार ६४१, मका ३२ हजार, सुर्यफुल १००, करडई एक हजार तर १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका चारा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी एकुण ८१ हजार ५७५.५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक २० हजार ७५३ तर खासगी ६० हजार ८२२.५ क्विंटलचा समावेश आहे. आतापर्यंत ३९ हजार ७६७ क्विंटलचे आवंटन देण्यात आले आहे. यापैकी प्रत्यक्षात ८ हजार ६७८.४ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे.करडई व सुर्यफुलाचे सर्वात कमी क्षेत्रजिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच १ लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यापाठोपाठ गव्हाच्या पिकाला शेतकरी पसंती दर्शवित आहेत. सूर्यफुलाकडे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. सुर्यफुल पिकाची केवळ १०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. करडई या पिकाला देखील शेतकºयांनी कमीच महत्त्व दिले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर या पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. यावरून करडई व सुर्यफुल या पिकाचे क्षेत्र सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाढीव क्षेत्रानुसार बियाण्यांचे नियोजन करण्याचे निर्देशमागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामातील क्षेत्रात दुपटीने वाढ होणार आहे. यामुळे बियाण्याची गरजदेखील वाढली आहे. शेतकºयांना लागवडीसाठी बियाणे कमी पडणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी बुलडाण्यात कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती