शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:18 IST

शहरी तसेच ग्रामिण भागात डेंग्यूचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

योगेश फरपट / विजय मिश्राखामगाव/शेगाव : शहरी तसेच ग्रामिण भागात डेंग्यूचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. किटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत खामगाव, शेगाव व मलकापूर पालिकेतर्फे डेंग्यू सर्व्हेक्षण मोहिमेस सुरवात झाली आहे. यासाठी पालिकेच्या मदतीने आरोग्य विभागाने जनजागृती सुरु केली आहे.डेंग्यूच्या डासांची पैदास साठवून ठेवलेल्या पाण्यात होत असल्याने ती स्थाने शोधून काढणे हे काम जिकीरीचे झाले आहे. यासाठी पालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सतर्क राहून डेंग्यूचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खामगावसह सर्वच शहरात पाण्याची टंचाई अद्याप कायम आहे. यामुळे नागरिकांना पावसाळ््यातही पाणी साठवण करावी लागत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.रुग्णांची संख्या वाढत असली तरी शेगाव व खामगाव वगळता इतर शहरामध्ये किंवा गावांमध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होतांना दिसत नाही. शेगाव शहरातील काही वस्त्यांसह ग्रामिण भागात प्रामुख्याने डें्ग्यूची लागण झाल्याचे दिसून येते. वेळीच उपाययोजना न केल्यास रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डेंग्यूच्या फैलावाला कारणीभूत असलेल्या डासांचा व त्यांच्या अळ्यांच्या नष्ट करण्यावर आरोग्य यंत्रणेचा भर आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो, त्या एडिस जातीच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहे. त्यासाठी अळ्या सापडलेल्या पाण्यात सेमिफॉस या तेल पाण्यात टाकून डास नष्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेगाव शहरात डेंगू रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून शहरात २२ ते २७ जुलैपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी, हिवताप अधिकारी व जिल्हाचिकित्सक यांचे सूचनेनुसार डेंगू व किटकजन्य रोग नियंत्रण करीता जनजागृती व डास, अळी कंटेनर सर्वेक्षण शोध मोहीम सोबत माहितीपत्रक सह घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण केले जात आहे. या पथकामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविकांचा समावेश आहे.जनतेला डेंगू आजार विषयक मार्गदर्शन करण्यासोबतच डेंगू सदृश्य अंडी आढळल्यास त्यामध्ये औषधी द्वारे निजंर्तुकीकरण ही करून दिल्या जात आहे. नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेवून ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावा असे आवाहन शेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी मानकर यांनी केले आहे.ही आहेत कारणेडेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंग्युचा प्रसार ‘एडीस एजिप्टाय’ नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स, कुलर आदींमध्ये डासांची उत्पत्ती होते.

कोरडा दिवस पाळावा , कोरडा दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे रिकामे करावेत. रांजण, माठ, हौद , टाकी व इतर हे पाण्याचे साठे घासून पुसून कोरडे करून तीन चार तासा नंतर पाणी भरावे त्यामुळे डासाची उत्पत्ती होणार नाही.- डॉ. बाळकृष्ण कांबळे,जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावdengueडेंग्यू