शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:32 IST

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या वर्षी अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा पावसाची संतधार सुरू असून गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे. महसूल विभागाकडून यासंदर्भातील सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यातंर्गत बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यात हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने जून महिन्याचा शेवटचा आठवडा व जुलै महिन्याच्या मध्यावर पडलेल्या पावसादरम्यान हे नुकसान झाले आहे.बुलडाणा जिल्ह्यात २३ जून नंतर खºया अर्थाने पावसाने जोर पकडला असून जुलै महिन्यातही पावसाने सातत्यपूर्ण हजेरी जिल्ह्यात लावली आहे. दरम्यान, पुरामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० गावांना गेल्या काही कालावधीत फटका बसलेला आहे. या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे बुलडाणा तालुक्यातील सातही मंडळामध्ये मोठे नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाची आकडेवारी स्पष्ट करते. या प्रकरणी प्रशासनाने त्वरेने नुकसानाच्या सर्व्हेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने महसूल विभागाकडून सध्या हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाला बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्याचे अहवाल प्राप्त झाल आहे. अन्य तालुक्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. प्राप्त अहवालांच्या आधारावर वर्तमान स्थितीत पाच हजार ९०७ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडत असतो दोन आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३६९ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तो ५५.२६ टक्के आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ९० मंडळांपैकी २२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुलडाण्यात सर्वाधिक नुकसानगेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सातही महसूल मंडळामध्ये त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या मध्ये एक हजार ५७० हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. दरम्यान फळबागांसह अन्य पिकांचे असे एकूण एक हजार ६१७ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाचा अहवाल सांगतो. दरम्यन, चिखली तालुक्यात १२ हेक्टर तर मोताळा तालुक्यात ११ हेक्टर असे एकूण एक हजार ६५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार ९०७ शेतकरी प्रभावीत झालेले आहेत. यामध्ये काही शेतकºयांचे नुकसान हे ३३ टक्क्यांच्या आतील आहे. मात्र अशा शेतकºयांची संख्या प्रामुख्याने मोताळा तालुक्यातील आहे.

४१६ विहीरी खचल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा आणि चिखली तालुक्यातील तब्बल ४१६ विहीरी खचल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकट्या बुलडाणा तालुक्यातील ३८६ विहीरी खचल्या आहेत तर चिखली तालुक्यातील ३० विहीरी खचल्याचे तहसिल कार्यालयाने पाठवलेल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे रब्बी हगांमात या शेतकºयांना प्रसंगी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या देऊळघाट सर्कलमधील १६९ विहीरींचे जून महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तर पाडळी आणि धाड सर्कलमधील अनुक्रमे ६६ आणि ५२ विहीरी खचल्या आहेत. बुलडाणा सर्कलमध्ये ११, साखळी बुद्रूक सर्कलमध्ये ३८, रायपूर सर्कलमध्ये ३५ आणि म्हसला बुद्रूक सर्कलमध्ये १५ विहीरी खचल्या आहेत.१९ मंडळामध्ये अतिवृष्टी

पावसाळ््याच्या गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील ९० मंडळापैकी १९ मंडळामध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद असून यामध्ये धाड, लोणी आणि डोणगाव या मंडळामध्ये प्रत्येकी दोनदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. जामोद, संग्रामपूर, पातुर्डा, चिखली, अमडापूर, हातणी, चांधई, पाडळी, म्हसला, अंढेरा, हिवरा, देऊळगाव, अंजनी, नायगाव, टिटवी, बोराखेडी या महसूल मंडळामध्ये प्रत्येकी एकदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती