शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:32 IST

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या वर्षी अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा पावसाची संतधार सुरू असून गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे. महसूल विभागाकडून यासंदर्भातील सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यातंर्गत बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यात हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने जून महिन्याचा शेवटचा आठवडा व जुलै महिन्याच्या मध्यावर पडलेल्या पावसादरम्यान हे नुकसान झाले आहे.बुलडाणा जिल्ह्यात २३ जून नंतर खºया अर्थाने पावसाने जोर पकडला असून जुलै महिन्यातही पावसाने सातत्यपूर्ण हजेरी जिल्ह्यात लावली आहे. दरम्यान, पुरामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० गावांना गेल्या काही कालावधीत फटका बसलेला आहे. या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे बुलडाणा तालुक्यातील सातही मंडळामध्ये मोठे नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाची आकडेवारी स्पष्ट करते. या प्रकरणी प्रशासनाने त्वरेने नुकसानाच्या सर्व्हेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने महसूल विभागाकडून सध्या हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाला बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्याचे अहवाल प्राप्त झाल आहे. अन्य तालुक्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. प्राप्त अहवालांच्या आधारावर वर्तमान स्थितीत पाच हजार ९०७ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडत असतो दोन आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३६९ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तो ५५.२६ टक्के आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ९० मंडळांपैकी २२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुलडाण्यात सर्वाधिक नुकसानगेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सातही महसूल मंडळामध्ये त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या मध्ये एक हजार ५७० हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. दरम्यान फळबागांसह अन्य पिकांचे असे एकूण एक हजार ६१७ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाचा अहवाल सांगतो. दरम्यन, चिखली तालुक्यात १२ हेक्टर तर मोताळा तालुक्यात ११ हेक्टर असे एकूण एक हजार ६५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार ९०७ शेतकरी प्रभावीत झालेले आहेत. यामध्ये काही शेतकºयांचे नुकसान हे ३३ टक्क्यांच्या आतील आहे. मात्र अशा शेतकºयांची संख्या प्रामुख्याने मोताळा तालुक्यातील आहे.

४१६ विहीरी खचल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा आणि चिखली तालुक्यातील तब्बल ४१६ विहीरी खचल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकट्या बुलडाणा तालुक्यातील ३८६ विहीरी खचल्या आहेत तर चिखली तालुक्यातील ३० विहीरी खचल्याचे तहसिल कार्यालयाने पाठवलेल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे रब्बी हगांमात या शेतकºयांना प्रसंगी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या देऊळघाट सर्कलमधील १६९ विहीरींचे जून महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तर पाडळी आणि धाड सर्कलमधील अनुक्रमे ६६ आणि ५२ विहीरी खचल्या आहेत. बुलडाणा सर्कलमध्ये ११, साखळी बुद्रूक सर्कलमध्ये ३८, रायपूर सर्कलमध्ये ३५ आणि म्हसला बुद्रूक सर्कलमध्ये १५ विहीरी खचल्या आहेत.१९ मंडळामध्ये अतिवृष्टी

पावसाळ््याच्या गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील ९० मंडळापैकी १९ मंडळामध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद असून यामध्ये धाड, लोणी आणि डोणगाव या मंडळामध्ये प्रत्येकी दोनदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. जामोद, संग्रामपूर, पातुर्डा, चिखली, अमडापूर, हातणी, चांधई, पाडळी, म्हसला, अंढेरा, हिवरा, देऊळगाव, अंजनी, नायगाव, टिटवी, बोराखेडी या महसूल मंडळामध्ये प्रत्येकी एकदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती