शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बुलडाणा : जिल्हाधिकारी पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:30 IST

डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी केली चर्चा त्वरित सर्व्हे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. डोणगाव परिसरातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी पुलकुंडवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, जि.प.सदस्य आशिष रहाटे, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, मीरा पागोरे, मंडळ अधिकारी रहोटे, तलाठी वंदना नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.शैलेश देशमुख, मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी मादणी येथे येऊन प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश दिले. यावेळी मादणी परिसरात नुकसान झालेल्या हरभरा, तूर, गहू, संत्रा, कांदा, लसून या  पिकांची पाहणी करून, तालुका कृषी अधिकारी सरोदे यांच्याकडून गारपीटग्रस्त गावाची माहिती घेऊन बाधित २७ गावांचा त्वरित सर्व्हे करून शासनाला देण्याचे निर्देश दिले. तर कृषी अधिकारी सरोदे यांनी युद्धपातळीवर शेतकरी नुकसानीचा सर्व्हे चालु असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सांत्वन करून त्वरित शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले, तर जिल्हाधिकार्‍यांपुढे शेतकरी वर्ग व व्यापारी यांनी समस्या मांडल्या. यावेळी मादणी येथील कैलास जाधव, भाजपाचे प्रा.केशव वाहेकर, माजी उपसभापती सतीश ताजणे, माजी पं.स.सभापती पंजाबराव मेटांगळे, डॉ.उल्हामाले, माजी सरपंच मधुकरराव धिरके, प्रा.डॉ.सचिन जाधव, गणेश दिवठाणे, दीपक दिवठाणेसह शेतकरी उपस्थित होते.     

शेतकर्‍यांना मदतीची हेक्टरी र्मयादा वाढवा-जाधवशासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत ठेवलेली र्मयादा वाढवावी, कारण विदर्भातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान या अवकाळी गारपिटीमुळे झालेले आहे, तसेच विदर्भातील शेतकर्‍यांकडे जमिनीचे क्षेत्र अधिक असल्याने शासनाने दोन हेक्टरी मदतीची र्मयादा वाढवून जेवढे नुकसान शेतकर्‍यांचे झाले तेवढी मदत शासनाने द्यावी, अशी मागणी यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.

गतवर्षीचे पैसे केव्हा मिळणार! मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांना सन २0१५-१६ मधील फळबाग आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना सर्व्हे होऊन मिळालेली नाही. तर मग आता हा गारपिटीचा सर्व्हे करुन आम्हाला मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न करताच जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणाची चौकशी करुन मला त्वरित अहवाल द्या, असा सर्वांसमक्ष आदेश कृषी अधिकारी सरोदे व तलाठी नाईक यांना दिला 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollectorतहसीलदार