शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

बुलडाणा : जिल्हाधिकारी पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:30 IST

डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी केली चर्चा त्वरित सर्व्हे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. डोणगाव परिसरातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी पुलकुंडवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, जि.प.सदस्य आशिष रहाटे, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, मीरा पागोरे, मंडळ अधिकारी रहोटे, तलाठी वंदना नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.शैलेश देशमुख, मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी मादणी येथे येऊन प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश दिले. यावेळी मादणी परिसरात नुकसान झालेल्या हरभरा, तूर, गहू, संत्रा, कांदा, लसून या  पिकांची पाहणी करून, तालुका कृषी अधिकारी सरोदे यांच्याकडून गारपीटग्रस्त गावाची माहिती घेऊन बाधित २७ गावांचा त्वरित सर्व्हे करून शासनाला देण्याचे निर्देश दिले. तर कृषी अधिकारी सरोदे यांनी युद्धपातळीवर शेतकरी नुकसानीचा सर्व्हे चालु असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सांत्वन करून त्वरित शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले, तर जिल्हाधिकार्‍यांपुढे शेतकरी वर्ग व व्यापारी यांनी समस्या मांडल्या. यावेळी मादणी येथील कैलास जाधव, भाजपाचे प्रा.केशव वाहेकर, माजी उपसभापती सतीश ताजणे, माजी पं.स.सभापती पंजाबराव मेटांगळे, डॉ.उल्हामाले, माजी सरपंच मधुकरराव धिरके, प्रा.डॉ.सचिन जाधव, गणेश दिवठाणे, दीपक दिवठाणेसह शेतकरी उपस्थित होते.     

शेतकर्‍यांना मदतीची हेक्टरी र्मयादा वाढवा-जाधवशासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत ठेवलेली र्मयादा वाढवावी, कारण विदर्भातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान या अवकाळी गारपिटीमुळे झालेले आहे, तसेच विदर्भातील शेतकर्‍यांकडे जमिनीचे क्षेत्र अधिक असल्याने शासनाने दोन हेक्टरी मदतीची र्मयादा वाढवून जेवढे नुकसान शेतकर्‍यांचे झाले तेवढी मदत शासनाने द्यावी, अशी मागणी यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.

गतवर्षीचे पैसे केव्हा मिळणार! मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांना सन २0१५-१६ मधील फळबाग आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना सर्व्हे होऊन मिळालेली नाही. तर मग आता हा गारपिटीचा सर्व्हे करुन आम्हाला मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न करताच जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणाची चौकशी करुन मला त्वरित अहवाल द्या, असा सर्वांसमक्ष आदेश कृषी अधिकारी सरोदे व तलाठी नाईक यांना दिला 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollectorतहसीलदार