शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा : जिल्हाधिकारी पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:30 IST

डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी केली चर्चा त्वरित सर्व्हे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. डोणगाव परिसरातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी पुलकुंडवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, जि.प.सदस्य आशिष रहाटे, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, मीरा पागोरे, मंडळ अधिकारी रहोटे, तलाठी वंदना नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.शैलेश देशमुख, मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी मादणी येथे येऊन प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश दिले. यावेळी मादणी परिसरात नुकसान झालेल्या हरभरा, तूर, गहू, संत्रा, कांदा, लसून या  पिकांची पाहणी करून, तालुका कृषी अधिकारी सरोदे यांच्याकडून गारपीटग्रस्त गावाची माहिती घेऊन बाधित २७ गावांचा त्वरित सर्व्हे करून शासनाला देण्याचे निर्देश दिले. तर कृषी अधिकारी सरोदे यांनी युद्धपातळीवर शेतकरी नुकसानीचा सर्व्हे चालु असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सांत्वन करून त्वरित शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले, तर जिल्हाधिकार्‍यांपुढे शेतकरी वर्ग व व्यापारी यांनी समस्या मांडल्या. यावेळी मादणी येथील कैलास जाधव, भाजपाचे प्रा.केशव वाहेकर, माजी उपसभापती सतीश ताजणे, माजी पं.स.सभापती पंजाबराव मेटांगळे, डॉ.उल्हामाले, माजी सरपंच मधुकरराव धिरके, प्रा.डॉ.सचिन जाधव, गणेश दिवठाणे, दीपक दिवठाणेसह शेतकरी उपस्थित होते.     

शेतकर्‍यांना मदतीची हेक्टरी र्मयादा वाढवा-जाधवशासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत ठेवलेली र्मयादा वाढवावी, कारण विदर्भातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान या अवकाळी गारपिटीमुळे झालेले आहे, तसेच विदर्भातील शेतकर्‍यांकडे जमिनीचे क्षेत्र अधिक असल्याने शासनाने दोन हेक्टरी मदतीची र्मयादा वाढवून जेवढे नुकसान शेतकर्‍यांचे झाले तेवढी मदत शासनाने द्यावी, अशी मागणी यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.

गतवर्षीचे पैसे केव्हा मिळणार! मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांना सन २0१५-१६ मधील फळबाग आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना सर्व्हे होऊन मिळालेली नाही. तर मग आता हा गारपिटीचा सर्व्हे करुन आम्हाला मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न करताच जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणाची चौकशी करुन मला त्वरित अहवाल द्या, असा सर्वांसमक्ष आदेश कृषी अधिकारी सरोदे व तलाठी नाईक यांना दिला 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollectorतहसीलदार