शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

बुलडाणा जिल्हा पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:28 IST

Buldhana News बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर बुलडाणा जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच सुरू राहणार असून, शासकीय तथा खासगी कार्यालयांमध्ये  एकूण संख्येच्या तुलनेत १५ टक्के  किंवा १५  व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल एवढी उपस्थिती गृहीत धरून कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी निर्गमित केला आहे. एक प्रकारे बुलडाणा जिल्ह्यात आता मिनी लॉकडाऊनचा प्रकार पाहण्यास मिळणार आहे. तसेच हॉटेल, उपाहागृहे प्रत्यक्ष चालू न ठेवता केवळ पार्सल सुविधेची परवानगी दिली आहे. लग्नसमारंभासाठीही निर्बंध लागू करण्यात आले असून, वधू-वरांसह केवळ २५ व्यक्तींना परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारची शाळा-महाविद्यालये बंदच राहणार आहेत. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी वाहनामध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवाशी, ॲटोमध्ये चालकाव्यतिरिक्त दोन, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवाशांना परवानगी राहणार आहे. दुसरीकडे मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत सूट राहणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  हा संपूर्ण आदेश १ मार्च २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. सोबतच वर्तमान स्थिती पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत देण्यात आलेली सूटही रद्द करण्यात आली असल्याचे यासंदर्भातील  आदेशात नमूद आहे.धार्मिक स्थळी दहा व्यक्तींना परवानगीजिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळी एकावेळी दहा व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे. या मर्यादेचे पालन करून धार्मिकस्थळे नागरिकांसाठी सुरू राहू शकतात. यासोबतच शहरी तथा ग्रामीण भागातील जमावबंदीच्या या कालावधीत सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृितक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांना बंदी राहणार आहे.

बस वाहतूकही ५० टक्के क्षमतेनेआंतरजिल्हा बसवाहतूकही एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेऊन सुरू ठेवता येईल. तसेच शारीरिक अंतर आणि निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतूक करता येणार आहे. त्यानुषंगाने  राज्य परिवहन महामंडळाने नियोजन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. या वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

१ मार्चपर्यंत बाजार बंदजिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे १ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरी तथा ग्रामीण भागात हा निर्णय लागू राहणार आहे. ठोक भाजीबाजार हा पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. तसेच येथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक