शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

बुलडाणा : पीककर्ज वाटपाचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:13 IST

पाच वर्षाचा पीक कर्ज वाटपाचा इतिहास पाहता सातत्याने पीक कर्ज वाटपाचा टक्का घसरत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकरी कर्जमाफीमुळे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ वाढलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा टक्का अद्यापही निच्चांकी पातळीवर असून तो सुधारण्याची गरज आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न केल्यास थेट बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी गत पाच वर्षाचा पीक कर्ज वाटपाचा इतिहास पाहता सातत्याने पीक कर्ज वाटपाचा टक्का घसरत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे यंदा तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे मोठे आव्हान जिल्ह्यातील बँकांसमोर उभे ठाकले आहे. १७ जून पर्यंत जिल्ह्यात दोन हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांच्या उदिष्ठापैकी अवघे ४११ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. ३० सप्टेंबर खरीप पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत असली तरी रेग्युलर पीक कर्ज भरणाºया शेतकºयांठी ३१ आॅगस्ट कर्ज भरण्याची मुदत देण्यात आल्याने खरीपात जिल्ह्यात प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने पीक कर्ज घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० जून पर्यंत अधिकाधिक कर्ज वाटप करण्याचे आव्हान बँकांसमोर उभे ठाकले आहे.एरवी बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या ही एक लाख ३० हजार ३०० च्या घरात असते. मात्र शेतकरी कर्जमाफीमुळे यंदा पीक कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे या नव्या शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करणे आवश्यक आहे.जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर आणि ग्रामस्तरावर पीक कर्ज वाटपाचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले असले तरी नव्याने कर्ज घेणाºया शेतकºयांना कागदपत्रांची जुळवा जुळव करणे गरजेचे आहे. त्यातच बँकांना मुद्रांक शुल्क ई-चलनाद्वारे घेण्याचे निर्देश दिलेले असतांनाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत दोन लाख ३२ हजार ५२८ शेतकºयांना पीक कर्ज कितपत मिळले, असा प्रश्न आहे.वर्तमान स्थितीत एकूण उदिष्ठाच्या अवघ्या १५ टक्के शेतकºयांना अर्थात ५२ हजार ९५२ शेतकºयांना ४११ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत जून अखेर पर्यंत आणखी किती शेतकºयांना पीक कर्ज मिळले, हा प्रश्न कायम आहे. गेल्या पाच वर्षात पीक कर्ज वाटपाचा टक्का हा ८७ टक्क्यांवरून गेल्या वर्षी अवघा २६ टक्क्यांवर आला आहे. जिल्हा बँकेनेचे कर्जवाटप ८९ टक्केजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत उदिष्ठाच्या ८९ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप केल आहे. जिल्हा बँकेला १३ हजार १०४ शेतकºयांना ६५ कोटी ५२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ होते. त्यापैकी बँकेने आतापर्यंत ११ हजार ६०४ शेतकºयांना पीक कर्ज वाटप केले आहे. एकंदरीत बँकेने ८९ टक्के शेतकºयांना ५१ कोटी ९५ लाख रुपयाचे पीक कर्ज वाटप केले आहे.

सार्वजनिक बँकांनी केले ११ टक्के कर्ज वाटपसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दोन लाख ८२ हजार २३० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ देण्यात आले आहे. त्यापैकी या बँकांनी आतापर्यंत ३१ हजार ५४९ शेतकºयांना २४४ कोटी सात लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.खासगी बँकांकडून ५ टक्के शेतकºयांनाच कर्जखासगी बँकांनी आतापर्यंत फक्त पाच टक्के शेतकºयांनाच कर्ज दिले आहे. त्याची रक्कम ४३ कोटी ४७ लाख रुपयांच्या घरात जाते. विदर्भ कोकण बँकेने उदिष्ठाच्या २३ टक्के शेतकºयांना आतापर्यंत कर्ज दिले आहे. त्याची रक्कम ८१ कोटींच्या घरात जाते.