शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बुलडाणा : जिल्हा बँकेवर पीककर्जाचा अवघा दोन टक्के भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:16 IST

बुलडाणा : जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा जाहीर झाला असतानाच शेतक-यांची बँक म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पीक कर्जाच्या एक हजार ८७७ कोटी रुपयांपैकी अवघे ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट स्वीकारले असून, एकूण उद्दिष्टांच्या ते अवघे दोन टक्के आहे. परिणामी, यंदा पुन्हा राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतक-यांची भिस्त राहणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकांवरच शेतक-यांची मदार जिल्हा बँकेला ५० कोटींचे उद्दिष्ट

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा जाहीर झाला असतानाच शेतक-यांची बँक म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पीक कर्जाच्या एक हजार ८७७ कोटी रुपयांपैकी अवघे ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट स्वीकारले असून, एकूण उद्दिष्टांच्या ते अवघे दोन टक्के आहे. परिणामी, यंदा पुन्हा राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतक-यांची भिस्त राहणार आहे.शेतकरी कर्जमाफीमुळे खस्ता हालतमधील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला जवळपास १४९ कोटी रुपये मिळून बँकेच्या थकीत कर्जदार ३० हजार शेतक-यांचे सातबारे कोरे झाले आहेत. या शेतकºयांपैकी प्रत्यक्षात जिल्हा बँकेचे उद्दिष्ट पाहता सात हजार ५०० शेतकºयांनाच जिल्हा बँक पीक कर्ज वाटप करू शकते, असे पतआराखड्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परिणामी, जिल्हा बँकेंतर्गतच्या २२ हजार ५०० शेतकºयांची भिस्त पुन्हा राष्ट्रीयीकृत बँक आणि पतसंस्थांवर राहण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. 

जिल्हा बँकेचा पतपुरवठ्यात हवा ३० टक्के वाटाजिल्हा बँकेच्या ७० शाखा आहेत. वार्षिक पतआराखड्याचा विचार करता ९६० कोटी रुपये अर्थात ३० टक्के वाटा जिल्हा बँकेचा असणे अपेक्षित आहे; मात्र जिल्हा बँकेकडील ठेवी आणि कर्जवाटपाचे प्रमाण पाहता अद्याप जिल्हा बँक त्यादृष्टीने सक्षम झालेली नाही. परिणामी, राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांवर जिल्ह्यातील कृषी पतपुरवठ्याची मदार येऊन पडली आहे. यामुळे या बँकांना पीक कर्ज पुरवठ्यामध्ये तब्बल ८२ टक्के वाटा उचलावा लागणार आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेलाही जवळपास १६ टक्के कृषी पतपुरवठा करावा लागणार आहे.

खरिपासाठी सरासरी ६९ हजारांचे कर्जजिल्ह्यातील तीन लाख २८ हजार ६६५ शेतकºयांना खरिपाचे एक हजार ७४५ कोटी रुपयांचे कर्ज पुढील आर्थिक वर्षात वाटप करावे लागणार आहे. सरासरी प्रती शेतकरी ते ६९ हजार रुपयांच्या आसपास जाते. जिल्ह्यात खरिपात सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र चार  हेक्टर, कापसाचे प्रस्तावित क्षेत्र एक लाख ७५ हजार हेक्टर, तुरीचे प्रस्तावित क्षेत्र ८५ हजार हेक्टर असून, कापूस व तुरीसाठी अनुक्रमे ७३५ आणि २९७ कोटी ५० लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करावा लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या आराखड्यात ओटीएस सभासद गृहित धरलेले नाहीत. ते गृहित धरले असता, केवळ उद्दिष्टाचे आकडे फुगले असतात. प्रत्यक्षात ते साध्य करता आले नसते. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. त्यामुळे तेथील शेतकºयांचे कर्जपुनर्गठण करावे लागेल.  - अरुण चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक