शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बुलडाणा: जलयुक्त शिवारच्या निधीला ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:23 IST

थितस्तरावरील या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन कोटी रुपयांची कामे प्रसंगी प्रभावीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील १ हजार ७३ गावात ४२५ कोटी रुपयांची जलयुक्तची कामे पुर्णत्वास गेली असतानाच उर्वरीत कामांच्या निधीला ब्रेक लावण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे उरलेल्या ३०३ गावातील सुमारे २०० कामे ही इतर नियोजित योजनांमधून पूर्ण करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र अधिकृतरित्या प्रशासकीय पातळीवर याबाबत सुचना नसल्याचेही एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, कथितस्तरावरील या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन कोटी रुपयांची कामे प्रसंगी प्रभावीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.राज्यातील काही भागात जलयुक्त शिवार योजनेच्या निधीला ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा आहे. त्या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली असता बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात या योजनेतंर्गत १ हजार ७३ गावात ४२५ कोटी ५ लाख रुपये खर्च करून २५ हजार १२९ कामे करण्यात आली असल्याची माहिती आहे. सोबतच त्यामुळे जिल्ह्यात १ लाख नऊ हजार नऊ टीसीएम एवढी साठवण क्षमता निर्माण झाल्याचे मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते.भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवर मोठा जोर दिला होता. त्यामुळे प्रारंभी २०१५-१६ या वर्षात जवळपास १८ यंत्रणांना सोबत घेऊन बुलडाणा जिल्ह्यात नऊ हजार २४६ कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी पहिल्याच वर्षी २०९ कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात सहा हजार १९५ कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी १२२ कोटी १६ लाख रुपये खर्च आला होता. तिसºया वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये पाच हजार ३७२ कामे करण्यात आली होती. त्यावर ६० कोटी सहा लाख रुपये खर्च झाला होता तर २०१८-२०१९ मध्ये या योजनेवर ३३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात येऊन चार हजार ३१६ कामे मार्गी लावण्यात आली होती.या चार वर्षाच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात १ लाख नऊ हजार नऊ टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाल्याचाही दावा नागपूर अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पीपीटीमधून केल्या गेला होता. कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, भूजल सर्व्हेक्षण, वन विभाग, सामाजिक वनिकरण, वन्यजीव विभाग, केम प्रकल्पाच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार