शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

बुलडाणा: जलयुक्त शिवारच्या निधीला ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:23 IST

थितस्तरावरील या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन कोटी रुपयांची कामे प्रसंगी प्रभावीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील १ हजार ७३ गावात ४२५ कोटी रुपयांची जलयुक्तची कामे पुर्णत्वास गेली असतानाच उर्वरीत कामांच्या निधीला ब्रेक लावण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे उरलेल्या ३०३ गावातील सुमारे २०० कामे ही इतर नियोजित योजनांमधून पूर्ण करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र अधिकृतरित्या प्रशासकीय पातळीवर याबाबत सुचना नसल्याचेही एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, कथितस्तरावरील या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन कोटी रुपयांची कामे प्रसंगी प्रभावीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.राज्यातील काही भागात जलयुक्त शिवार योजनेच्या निधीला ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा आहे. त्या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली असता बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात या योजनेतंर्गत १ हजार ७३ गावात ४२५ कोटी ५ लाख रुपये खर्च करून २५ हजार १२९ कामे करण्यात आली असल्याची माहिती आहे. सोबतच त्यामुळे जिल्ह्यात १ लाख नऊ हजार नऊ टीसीएम एवढी साठवण क्षमता निर्माण झाल्याचे मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते.भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवर मोठा जोर दिला होता. त्यामुळे प्रारंभी २०१५-१६ या वर्षात जवळपास १८ यंत्रणांना सोबत घेऊन बुलडाणा जिल्ह्यात नऊ हजार २४६ कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी पहिल्याच वर्षी २०९ कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात सहा हजार १९५ कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी १२२ कोटी १६ लाख रुपये खर्च आला होता. तिसºया वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये पाच हजार ३७२ कामे करण्यात आली होती. त्यावर ६० कोटी सहा लाख रुपये खर्च झाला होता तर २०१८-२०१९ मध्ये या योजनेवर ३३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात येऊन चार हजार ३१६ कामे मार्गी लावण्यात आली होती.या चार वर्षाच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात १ लाख नऊ हजार नऊ टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाल्याचाही दावा नागपूर अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पीपीटीमधून केल्या गेला होता. कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, भूजल सर्व्हेक्षण, वन विभाग, सामाजिक वनिकरण, वन्यजीव विभाग, केम प्रकल्पाच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार