शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

बुलडाणा: वर्षभरात अपघातात ३१९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:05 IST

बुलडाणा जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी ४८ अपघातामध्ये २७ व्यक्ती मृत्यू पावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघाताने ३१९ व्यक्तींचे बळी घेतले असून २०१८ च्या तुलनेत अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी ४८ अपघातामध्ये २७ व्यक्ती मृत्यू पावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.नववर्षापासून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तरीही गतवर्षीची अपघातांची संख्या व त्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या ही जिल्ह्यात रस्ते प्रवास किती सुरक्षीत आहे, याचे वास्तव समोर आणणारा आहे. परिणामस्वरुप खासदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांचेही गांभिर्य यामुळे वाढले आहे.जिल्ह्यात ८५ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, चिखली-मेहकर, खामगाव-देऊळगाव राजा, शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाचे बुलडाणा जिल्ह्यातील भागात सध्या वेगाने कामे चालू आहे. यामध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली, वाहनांच्या तंदुरुस्तीचा अभाव, रस्ता दुरुस्तीदरम्यान कंत्राटदारांकडून न होणारे नियमांचे पालन, वाहन चालकांचा दोष यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा जिल्ह्यातून गेलेला सुमारे ८५ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. अलिकडील काळात हा महामार्ग मृत्यूचा सापळाच बनला आहे. या मार्गावर दररोज अपघात घडत आहे. १६ ब्लॅक स्पॉटचेही काम झाले आहे.२०१८ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण वाढलेबुलडाणा जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये ३०४ व्यक्ती ६४८ अपघातामध्ये मृत्यू पावले होते. तर २०१९ मध्ये ५७२ अपघातामध्ये ३१९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सातत्याने बुलडाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत असून गेल्या दहा वर्षामध्ये खामगाव-देऊळगाव राजा हा रस्ता किलर ट्रॅक ठरला आहे. आता त्या पाठोपाठ मलकापूर ते खामगाव दरम्यानचा एनएच क्र. सहा किलर ट्रॅक ठरत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसोबतच नव्याने होणारी रस्त्याची कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याची गरज निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर झाले १६ अपघातखामगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गत वर्षभरात बाळापूर ते मलकापूर दरम्यान मोठ्या व छोट्या वाहनांचे मिळून १६ पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. मलकापूरनजीक ट्रक-मालवाहूमध्ये अपघात होवून एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. महामार्ग विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरु असल्याने अपघात घडत असल्याचे दिसून येते. २०१९ मधील सर्वात मोठा अपघात हा मलकापूरनजीक अनुराबाद येथे घडला होता. यामध्ये भरघाव कंटेनरने एका प्रवासी वाहतूक करणाºया वाहनास चिरडले होते. यामध्ये ठार झालेल्या १३ जणांपैकी ५ जण एकट्या अनुराबाद येथील असल्याने या गावातील नागरिकांना चांगलाच धक्का बसला होता. राष्ट्रीय महामार्गावरील टेंभूर्णा फाटा, वडनेर, सजनपूरी, अकोला बायपास, घाटपुरी या स्थळांना अपघातप्रवण स्थळ म्हणून ओळखले जाते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात