शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

बोगस दिव्यांगांची होणार फेरतपासणी!

By admin | Updated: May 18, 2017 00:27 IST

जिल्हा परिषद सीईओंनी दिला चौकशीचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्र घेऊन शासकीय योजनांचा लाभ लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जिल्ह्यात बरीच फोफावली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शण्मुखराजन यांनी बुधवारी दिला. त्यामुळे बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक करीत असल्याचे वृत्त लोकमतने १६ व १७ मे रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दखल घेत दिव्यांग कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात असलेल्या सर्वच दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर यापैकी बोगस कोण व खरे दिव्यांग कोण? याची शहानिशा होईल. या तपासणीत बोगस आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शण्मुखराजन यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रत्येक विभागात अनेक दिव्यांग कर्मचारी आहेत. बदली न होणे, कार्यालयात उशिरा येण्यास मिळणारी सुट तसेच जनगणनासारख्या शासनाच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्याची गरज नसल्यामुळे नोकरी लागल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेतले. यामध्ये कर्मचारी कर्ण-बधिर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग कर्मचारी आहेत. अनेक दिव्यांगांकडे वाहन परवाने जिल्ह्यात असलेल्या अनेक दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालविण्याचे परवाने आहेत. जर हे कर्मचारी दिव्यांग आहेत तर त्यांच्याकडे परवाने कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक कर्मचारी शासनाकडे लाभ घेताना दिव्यांगत्वाचे तर आरटीओकडे वाहन परवाना काढताना फिटनेस सर्टीफिकेट देत आहेत. काही हजारात दोन्ही प्रमाणपत्र मिळत असल्याची चर्चा आहे. सदर कर्मचारी कार्यालयात किंवा शाळेत जाताना आपल्या चारचाकी वाहनाने जात असून, बदलीच्या वेळी किंवा अन्य लाभाच्यावेळी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दाखवितात. कायद्यानुसार दिव्यांगाची चौकशी आवश्यक अपंग समान संधी कायदा १९९५ प्रकरण ४ नुसार दिव्यांगांचा सत्वर शोध व प्रतिशोेध घेणे महत्त्वाचे आहे. खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होऊ नये, याकरिता शासनाने दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांची फेरतपासणी करणे गरजेचे आहे. ही शासनाची जबाबदारी आहे; मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होतो. प्रमाणपत्रांची नाही तर शारीरिक पुनर्पडताळणी हवी!जिल्हा परिषद सीईओ यांनी फेरतपासणी करण्याचा आदेश दिला आहे; मात्र दिव्यांग असलेल्या कर्मचाऱ्यांच्या केवळ प्रमाणपत्रांची नाही तर शारीरिक पुनर्पडताळणी होणे आवश्यक आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ सदानंद कोचे यांनी दिव्यांगाच्या शारीरिक पुनर्पडताळणीचा आदेश दिला होता; मात्र त्यावेळी ही पडताळणी होऊ शकली नाही. यावेळी सीईओंनी दिव्यांग कर्मचाऱ्यांची शारीरिक पुनर्पडताळणी करून खरे दिव्यांग व दिव्यांगाचे प्रमाणपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पदृष्टी असलेले शिक्षकडॉक्टरांनुसार ४० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पदृष्टी असलेले व्यक्ती शिकविण्याचे काम करू शकत नाहीत; मात्र जिल्ह्यात ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अल्पदृष्टी असलेले शिक्षक आहेत.