शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

‘बळीराजा संजीवनी’साठी नाबार्डतंर्गत कर्ज घेण्याच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:35 IST

बळीराजा संजीवनी प्रकल्पातंर्गत येत असलेल्या प्रकल्पांसाठी नाबार्डकडून अल्पदरात कर्ज घेण्याच्या दृष्टीने राज्य शाससन चाचपणी करत आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा: जिगाव सारखे महत्वाकांक्षी प्रकल्पांना कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीकोणातून अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोणातून बळीराजा संजीवनी प्रकल्पातंर्गत येत असलेल्या प्रकल्पांसाठी नाबार्डकडून अल्पदरात कर्ज घेण्याच्या दृष्टीने राज्य शाससन चाचपणी करत आहे. दरम्यान, जलसंपदा विभाग आणि वित्त विभागाच्या वरिष्ठांनी या प्रश्नी एकत्र येऊन अनुषंगीक मार्ग काढण्याच्या सुचना २१ जानेवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत देण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यासह अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दुर करण्याच्या दृष्टीकोणातून महत्त्वाकांक्षी म्हणून गणल्या जाणाºया जिगाव प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्णत्वास जावा या दृष्टीकोणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ जानेवारी रोजी मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे, वित्त विभागाचे प्रधान सचिव सवनिक, वित्त सल्लागार समितीचे मित्तल, प्रकल्प समन्वयक संजय घाणेकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल, अविनाश सुर्वे यांच्यासह अन्य उपस्थित होते. जिगाव प्रकल्पाला अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता प्रामुख्याने हा मुद्दा उपस्थित झाला होता. राज्याचे जलसंपदा विभागाचे वार्षिक बजेट हे दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यातून एकट्या जिगाव प्रकल्पाला निधी उपलब्ध झाल्यास अन्य ठिकाणाहूनही निधीची मागणी होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर बळीराजा संजीवनी प्रकल्पातंर्गत राज्य शासनाच्या ७५ टक्के हिश्शाची रक्कम ही नाबार्ड अंतर्गत रूरल इम्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (आरआयडीएफ) आणि नॅशनल  इम्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एजन्सी (एनआयडीए) अंतर्गत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून त्यातंर्गत बळीराजा संजीवनी प्रकल्पातंर्गत समाविष्ठ असलेल्या ९१ प्रकल्पांना निधी उपलब्ध केला जाऊ शकतो, अशी चर्चा या बैठकीत झाली. मुळात बलीराजा संजीवनी प्रकल्पामध्ये राज्य शासन ७५ टक्के आणि केंद्र सरकार २५ टक्के निधी देते. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत मार्गी लागू शकतात, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. त्यानुषंगाने आता जलसंपदा आणि वित्त विभाग अनुषंगीक निधीबाबात तोडगा काढून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले. बळीराजा संजीवनी प्रकल्पातंर्गत राज्य शासनाच्या १०० टक्के हिश्श्याची तरतूद यातून होऊ शकते, असा सुरही बैठकीत चर्चिल्या गेला. त्याबाबतची दिशा आता जलसंपदा विभाग आणि वित्तविभागाला ठरवावी लागणार आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पासाठी अर्थसंकल्पीय अधिवेश़नात पुरक मागणी ही जलसंपदा विभाग करणार असून या प्रकल्पाला निधीच्या निकडीची गंभिरताही या बैठकीमुळे अधोरेखीत झाली आहे.  या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रसंगी नाबार्डकडूनही निधी उपलब्ध करण्यात येईल, असे संकेत ही बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना