शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

घाटाखालील विविध तालुक्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:35 IST

घाटाखालील  विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव  आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले.

ठळक मुद्देकपाशी, तूर पिकाची पाहणी वातावरणातील बदलामुळे तुरीलाही धोका!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: घाटाखालील  विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव  आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले.गेल्या महिन्यातील ढगाळ वातावरण तसेच तापमानातील तफावत रस शोषक किडीच्या वाढीसाठी अनुकूल असल्यामुळे प्रादुर्भाव वाढला आहे. बिटी कपाशी पिकावर मागील दोन-तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीने कपाशी पिकावर प्रतिकारक्षमता विकसित केली आहे, असे दिसून येते. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येणारी गुलाबी बोंडअळी यावर्षी सप्टेंबरमध्येच आढळून आली तरी शेतकरी बांधवांनी आपल्या कपाशी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी एन.के. राऊत, कीटकनाशक ए.टी. गाभणे, संजय उमाळे, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद, डी.बी. सवडतकर तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर, कीड नियंत्रक विलास परिहार कीड सर्वेक्षक, वैभव वाघ, वैभव गाळकर व सोपान सपकाळ यांच्या संयुक्त चमूने पाहणी केली.

असे करावे कीड व्यवस्थापन!पिवळा रंगाचे चिकट सापळे हेक्टरी २५ ते ३0 लावावीत किंवा जैविक कीटकनाशक ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अँझाडिरेक्टिन १0 हजार पीपीएम, १ किली प्रति लीटर पाण्यातून फवारणी करावी.  वरील उपाययोजना केल्यानंतरसुद्धा कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीने व पांढर्‍या माशीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास खालीलप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. फेनप्रोप्राथ्रिन १0 ई.सी. १0 मिली किंवा इन्डोक्झिकार्ब १५.८ ईसी, ७ मिली व पांढरी माशीसाइी फ्लोनिकॅमिड ५0 डब्ल्यूजी, २ ग्राम तसेच तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हपी) च्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झिकार्ब १५.६ ईसी ७ मिली किंवा क्लोरन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मिली १0 लीटर पाण्यातून फवारणी करावी, असे आवाहन केले आहे.     

संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात पाहणीजळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील निंभोरा, खेर्डा, चांगेफळ, रुधाना, वकाना, निवाणा आदी परिसरात कपाशी आणि तूर पिकाची पाहणी करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यात कपाशीचा १७ हजार ९७१ हेक्टरवर पेरा असून, ५00४ हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आहे.

ओलिताची शेती व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ३१ डिसेंबरनंतर कपाशी पीक शेतातून पूर्णत: नष्ट करावे, जेणेकरून गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होईल.- एन.के. राऊत,उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस