शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:35 IST

संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.

ठळक मुद्देपिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे.कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.अनंता विलासराव अवचार यांचे गट क्र.२७२ मध्ये एक एकर शेत आहे. त्यांनी यावर्षी कपाशीची लागवड केली. मशागतीची कामे सुध्दा वेळच्यावेळी केली. निंदन, रासायनिक खत, महागड्या औषधांची फवारणी सुध्दा केली. मात्र पिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे. कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले. कपाशी पिकावर कोकडा, लाल्या व बोंडअळीने आक्रमण केल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. महागडी खते तसेच औषधांची फवारणी केल्याने मोठा आर्थीक फटकाही अवचार यांना सहन करावा लागला. अवचार यांचेकडे भारतीय स्टेट बँक शाखा संग्रामपूरचे ९० हजार रुपये कर्ज आहे. तसेच निशांत बँक शाखा संग्रामपूरचे ७५ हजार रुपये कर्ज आहे. यावर्षी चांगले पीक येईल, या आशेवर शेतकºयाने कर्ज काढून पेरणी केली. मात्र उत्पन्न येण्याआधीच पिकावर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली. आधीच पाऊस अल्प प्रमाणात पडला, त्यात पिकांवर संक्रांत आल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.नैसर्गीक संकटांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडल्या जात आहे. शासनाकडून शेतकºयांना मदतीची घोषणा होते, मात्र वेळेवर मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कर्ज काढून पेरणी करायची आणि नंतर निसर्गाचे दृष्टचक्रात व रोगराई मुळे पिके उद्ध्वस्त होतात, असा अनुभव शेतकºयांसाठी नित्याचाच झाला आहे. नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी