शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:35 IST

संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.

ठळक मुद्देपिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे.कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.अनंता विलासराव अवचार यांचे गट क्र.२७२ मध्ये एक एकर शेत आहे. त्यांनी यावर्षी कपाशीची लागवड केली. मशागतीची कामे सुध्दा वेळच्यावेळी केली. निंदन, रासायनिक खत, महागड्या औषधांची फवारणी सुध्दा केली. मात्र पिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे. कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले. कपाशी पिकावर कोकडा, लाल्या व बोंडअळीने आक्रमण केल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. महागडी खते तसेच औषधांची फवारणी केल्याने मोठा आर्थीक फटकाही अवचार यांना सहन करावा लागला. अवचार यांचेकडे भारतीय स्टेट बँक शाखा संग्रामपूरचे ९० हजार रुपये कर्ज आहे. तसेच निशांत बँक शाखा संग्रामपूरचे ७५ हजार रुपये कर्ज आहे. यावर्षी चांगले पीक येईल, या आशेवर शेतकºयाने कर्ज काढून पेरणी केली. मात्र उत्पन्न येण्याआधीच पिकावर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली. आधीच पाऊस अल्प प्रमाणात पडला, त्यात पिकांवर संक्रांत आल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.नैसर्गीक संकटांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडल्या जात आहे. शासनाकडून शेतकºयांना मदतीची घोषणा होते, मात्र वेळेवर मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कर्ज काढून पेरणी करायची आणि नंतर निसर्गाचे दृष्टचक्रात व रोगराई मुळे पिके उद्ध्वस्त होतात, असा अनुभव शेतकºयांसाठी नित्याचाच झाला आहे. नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी