शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बोगस बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:02 IST

आठवडाभरात यापैकी २०० कृषी केंद्राची तपासणी करून ५१ बियाणे आणि खतांचे नमुने अनुक्रमे नागपूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत.

बुलडाणा: बोगस बियाण्यामुळे दरवर्षी शेतकºयांना बसणारा आर्थिक फटका पाहता, कृषी विभागाने जिल्ह्यातील सुमारे १ हजार १५० कृषी केंद्राच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. आठवडाभरात यापैकी २०० कृषी केंद्राची तपासणी करून ५१ बियाणे आणि खतांचे नमुने अनुक्रमे नागपूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. येत्या कालावधीत याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.खरीप पेरणीचे जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रमुख्याने सोयाबीन ४ लाख ६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर व कापुस १ लाख ७४ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन  आहे. पेरणीसाठी १ लाख ३९ हजार ४० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. पेरणी केल्यानंतर बियाणे न उगवणे, झाडांना फळधारणा न होणे, कपाशीवर बोंडअळीसारखे संकट येणे हा दरवर्षीचा अनुभव पाहता कृषी विभागाने गत आठवडाभरापासून जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. खरीप हंगामासाठी लागणाºया खत बियाण्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावरील एक असे एकूण १४ दक्षता पथक जिल्ह्यात कार्यन्वीत करण्यात आले आहेत. या दक्षता पथकांकडून मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कषी केंद्राची प्रत्यक्ष तपासणी सुरू झाली आहे. कृषी केंद्राच्या तपासणीमध्ये खत व बियाण्यांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्याचबरोबर कृषी केंद्राचे रेकॉर्ड, परवाना, बियाण्यांचे स्त्रोत, कागदपत्र तपासणी करण्यात येऊन संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधीतांना थेट विक्री बंदचे आदेश दिले जातात. गेल्या आठवडाभरामध्ये २०० च्यावर कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली असून सध्या या तपासणीला वेग आला आहे. यामध्ये एकूण ५१ खत, बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नुमने नागपूर व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापुढेही कृषी निविष्ठांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.  सोयाबीनच्या आठ नमुन्यांचा समावेशकृषी विभागाच्या दक्षता पथकाने कृषी केंद्रावरून घेतलेल्या खत, बियाण्यांच्या नमुन्यामध्ये सोयाबीनच्या आठ नमुन्यांचा समावेश आहे. सोयाबीनचे हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तर खताचे ४३ नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

 १४ पथकात ६९ अधिकारीकृषी निविष्ठांच्या प्रभावी गुणनियंत्रणासाठी कार्यन्वीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय दक्षता पथक व तालुकास्तरीय दक्षता पथक अशा एकूण १४ पथकामध्ये ६९ अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हा स्तरीय दक्षता पथकामध्ये कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक, सहाय्यक नियंत्रक वैद्य मापन शास्त्र, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद अशा एकूण चार अधिकाºयांचा यामध्ये समावेश आहे. तर तालुकास्तरीय पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन मापे निरिक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अशा एकूण पाच अधिकाºयांचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती