शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

शहरातील रक्तपेढ्या ऑक्सिजनवर, साठा मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. लसीकरणानंतर तत्काळ रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची ...

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. लसीकरणानंतर तत्काळ रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या ८३ बॅगा रक्तसाठा उपलब्ध आहे. इतरही रक्तपेढ्यांमध्ये मर्यादितच साठा असल्याने रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असल्याचे चित्र आहे.

विविध आजारांच्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते. यामध्ये सिकलसेल, थॅलेसीमीया व इतर आजाराच्या रुग्णांसह अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या लसीकरणामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वेगाने घटत आहे. यामुळे या आजाराच्या रुग्णांना सध्या रक्त उपलब्ध होत आहे. मात्र येत्या काही दिवसांत रक्ताचा खूप मोठा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपरोक्त आजाराच्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर बनू शकते. यामुळे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तपेढ्यांमधील सध्याच्या रक्तसाठ्याचा विचार करता, एखादा मोठा अपघात झाल्यास हा रक्तसाठा एकाचदिवशी संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसाधारणपणे सात ते आठ दिवस पुरेल एवढा रक्तसाठा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

शासकीय रक्तपेढीत चार दिवसांचाच साठा

येथील शासकीय रक्तपेढीत आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतर रक्तदानासाठी येणाऱ्या रुग्णांना रक्त चढविल्याशिवाय परतण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी ही चिंतेची बाब आहे. याकरिता युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

लसीकरणाआधी करा रक्तदान

कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. याबाबत माहिती असलेले रक्तदाते लसीकरणापूर्वी रक्तदान करत आहेत. मात्र ही बाब सर्वांनाच माहीत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. यामुळे लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राऊत यांनी केले आहे.

कोरोना काळातील रक्तसंकलनाची स्थिती

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीला महिन्याला १८० बॅगा रक्तसाठा लागतो. सर्वसाधारणपणे रक्त उपलब्ध करून देताना संबंधित रुग्णाकडून डोनर घेण्यात येतो. यामुळे रक्तसाठा मर्यादित असला, तरी यामध्ये काही प्रमाणात वाढ होत पुढील गरज भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात.

कोरोनामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे एप्रिल, मे व जून महिन्यात रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र काही सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने नियमित गरज असलेल्या रुग्णांच्या रक्ताची गरज भागविण्यात मदत होते. काही रक्तदाते स्वत:हून रक्तदानासाठी पुढाकार घेत असल्याने शक्यतो अडचण निर्माण होत नाही.

सध्या अतिशय कमी रक्तसाठा उपलब्ध आहे. यामुळे वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. संभाव्य धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी नियमित रक्तदान करणाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या माध्यमातून रक्त उपलब्ध झाल्यास अडचण दूर होण्यास मदत होऊ शकते.

............................