शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

'बीजेएस' बुलडाणा जिल्ह्यातील शेतीला करणार आणखी समृध्द; राळेगणसिद्धी व हिवरे बाजारला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:45 IST

बुलडाणा : सुजलाम सुफलाम प्रकल्पाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील शेती व शेतकरी अजून समृद्ध करण्याच्या दिशेने आता प्रयत्न होणार आहेत.

ठळक मुद्दे बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या संकल्पनेतून सुरु होणार असलेल्या या पुढील टप्प्यातील कामाची दिशा आता निश्चित होत आहे.मोताळा, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५० शेतकºयांनी समृद्धी यात्रेअंतर्गत नुकतीच हिवरे बाजार व राळेगणसिद्धी येथे भेट दिली.

बुलडाणा : सुजलाम सुफलाम प्रकल्पाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील शेतीशेतकरी अजून समृद्ध करण्याच्या दिशेने आता प्रयत्न होणार आहेत. बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या संकल्पनेतून सुरु होणार असलेल्या या पुढील टप्प्यातील कामाची दिशा आता निश्चित होत आहे. मोताळा, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५० शेतकºयांनी समृद्धी यात्रेअंतर्गत नुकतीच हिवरे बाजार व राळेगणसिद्धी येथे भेट दिली. चेन्नईस्थित मिशन समृद्धी संस्थेच्या सहकार्याने ही अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. हिवरे बाजार व राळेगणसिध्दी या दोन्ही गावांमध्ये आदर्श गाव म्हणून करण्यात आलेले काम हे अत्यंत उपयुक्त स्वरूपाचे असल्याने या ठिकाणच्या कामाची माहिती घेण्याकरिता हा उपक्रम आयोजित केला होता. हिवरे बाजार मध्ये झालेल्या पाणलोट क्षेत्र विकास, ग्राम विकास, दुग्धविकास, फळबाग लागवड, सुसज्ज शाळा, ग्रामसंसद इमारतीची पाहणी, मागील १५ वर्षाहून अधिक काळ सुस्थितीमध्ये असलेले व एकदाही डागडुजी करावी न लागलेले अंतर्गत रस्ते, युवकांचे संघटन, व्यसनमुक्ती, प्रत्येक कामासाठी गाव पातळीवर समिती अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण माहिती राज्याच्या आदर्श गाव योजनेचे प्रमुख पोपटराव पवार यांनी दिली. ही सर्व कामे पाहताना शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत होते. स्वातंत्र्यदिनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केलेल्या उत्तुंग कामाची माहिती घेण्यात आली. यावेळी त्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन सर्वांच्याच स्मरणात राहील असे होते. कोणत्याही चांगल्या सामाजिक कामासाठी कोणालातरी आधी त्याग करावा लागतो, तरच मोठे काम उभे राहते. कृती आणि बोलणे यातील फरक कमी झाला पाहिजे. सामाजिक कामासाठी उत्तम निष्कलंक चारित्र्य, त्याग आणि समर्पण भावना गरजेची असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले. येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमालाही या सर्व शेतकºयांनी हजेरी लावली. मिशन समृद्धी संस्थेचे प्रकल्प संचालक राम पप्पू हे देखील आपल्या सहकाºयासमवेत या यात्रेत सहभागी झाले होते. लवकरच जिल्ह्यासाठी करावयाच्या पुढील कामाचे नियोजन करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात २८३ ठिकाणाहून गाळ काढला

बुलडाणा जिल्ह्यातील या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात २८३ ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. सुमारे ४००० पेक्षा अधिक शेतकºयांच्या शेतात तो पसरवण्यात आला. यामुळे कित्येक हेक्टरमधील पडीक जमीन आता शेतीयोग्य झाली आहे. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने गाळ काढलेल्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा तयार होण्याची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती