शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडावर भाजपचे वर्चस्व, राकाँचा सफाया

By admin | Updated: October 20, 2014 00:24 IST

१५ पैकी ९ मतदारसंघ भाजपच्या ताब्यात, काँग्रेसच्या खात्यात तीन, तर शिवसेनेच्या खात्यात दोन जागा.

अकोला: यूती आणि आघाडीतील घटस्फोटामुळे झालेले मतविभाजन आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचे परिणाम पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निकालावर दिसून आले. तिन्ही जिल्ह्यातील १५ पैकी ९ मतदारसंघांवर भाजपने ताबा मिळवला. काँग्रेसला तीन मतदारसंघांमध्ये, तर शिवसेनेला दोन मतदारसंघांवर विजय मिळवता आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भागातून सफाया झाला असून, भारिप-बहूजन महासंघाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांमध्ये विजयश्री मिळवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. आकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश सुधाकर गणगणे यांचा ३१४११ मतांनी पराभव केला. भारसाकळे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले. भारिप-बमसंने बाळापूरचा गड कायम राखला. बळीराम सिरस्कार यांनी तिरंगी लढतीत काँग्रेसचे सै. नातिकोद्दिन खतीब आणि भाजपचे तेजराव थोरात यांना पराभूत केले. अकोला पश्‍चिममध्ये गोवर्धन शर्मा सलग पाचव्यांदा विजयी झालेत. त्यांनी ६६९३४ मतं मिळवून राकाँचे विजय देशमुख यांच्यावर ३९९५३ मतांनी विजय मिळविला. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांनी भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांच्यावर २४४0 मतांनी निसटता विजय मिळविला. मूर्तिजापूरमध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी भाजपचा गड दुसर्‍यांदा राखला. वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा, या दोन मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला असून, भाजपच्या लाटेतही काँग्रेसने रिसोड मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. वाशिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. कारंजा मतदारसंघाची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र पाटणी हे या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात होते. मोदींची लाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे या मतदारसंघात राजेंद्र पाटणी यांना विजय मिळाला. रिसोड मतदारसंघावर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या मतदारसंघात यावेळीही काँग्रेसचे अमित झनक आणि भाजपचे विजय जाधव यांच्यातच खरी लढत झाली. जाधव यांचे कडवे आव्हान झनक यांनी लिलया पेलून, १५ हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलत्या राजकारणाची नांदी ठरली आहे. दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे आणि धृपदराव सावळेंसह रेखाताई खेडेकर या दिग्गजांना पराभूत करून, मतदारांनी नव्या चेहर्‍यांना पसंती दिली आहे. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी तीन भाजप, तर काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाली.