शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हिंदुत्वाची भाषा भाजपने शिकवू नये : उद्धव ठाकरे

By सदानंद सिरसाट | Updated: February 22, 2024 21:44 IST

...त्यामुळे हिंदुत्वाची भाषा भाजपने आम्हाला शिकवू नये, असा टोला शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव जामोद येथे आयोजित सभेत लगावला.

जळगाव जामोद (बुलढाणा) : हिंदुत्वाची भाषा सर्वप्रथम शिवसेनेने सुरू केली. मुंबईतील जागा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढून ती शिवसेनेच्या उमेदवाराने जिंकली होती. त्यावेळीच भाजपने तो मुद्दा घेऊन पुढील वाटचाल सुरू केली. त्यामुळे हिंदुत्वाची भाषा भाजपने आम्हाला शिकवू नये, असा टोला शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव जामोद येथे आयोजित सभेत लगावला.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या माेठ्या आहेत. त्यांना कर्जापायी रात्रीची झोप येत नाही. अतिवृष्टीने खरीप तर अवकाळीने रब्बी हंगाम हातचा गेला. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. ती देण्याचे काम शासनाचे आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता रस्त्यावर येऊन केंद्र शासनाला झुकवण्याची गरज आहे. त्यासाठी आपली लढाई आहे. ती आपणा सर्वांना लढावी लागणार आहे. गुजरात समृद्ध करण्याला आमचा विरोध नाही. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन नव्हे तर राज्यातील प्रकल्प महाराष्ट्रातच राहण्याची गरज आहे. 

राज्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या परिस्थितीत उपाययोजनांचीही मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याकडे शासनकर्त्यांनी लक्ष द्यावे, यासाठी जनतेनेच प्रश्न विचारायला हवेत. शेतकऱ्यांला हमी मिळेल तसेच तो पिकवेल ते विकण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे. शेतकरी स्वाभिमानी आहे. देशातील कोणताही शेतकरी कर्ज बुडवून परदेशात पळून गेला नाही. त्याचवेळी कर्ज घेऊन पळणाऱ्यांची संख्या देशात मोठी असल्याचेही ते म्हणाले.

हुकूमशाही, एकाधिकारशाहीविरुद्ध लढाई -आमच्या कुटुंबाबद्दल बाेलले जाते. ते बोला. मात्र, आमची लढाई सुरू असलेल्या एकाधिकारशाही, हुकूमशाहीविरुद्धची आहे. ती लढतच राहू, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला. पुढची पिढी स्वातंत्र्यात ठेवायची असेल तर हुकूमशाहीविरुद्ध सर्वांना लढावं लागणार आहे. ती आपल्या सर्वांची लढाई आहे, असे ते म्हणाले.

छत्रपतींना अभिमान वाटेल असेच काम करा... -ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. यापुढील काळात अन्याय, अत्याचार, हुकूमशाहीविरुद्ध लढून छत्रपती शिवराय, जिजाऊ, बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटेल, असेच काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना