शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:45 IST

यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते.

 बुलडाणा : भाजपाचे नेते शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषेत विधान करून अवमान करीत आहेत. यावरून भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. मात्र यापुढे शेतकऱ्यांचा अवमान सहन करून घेणार नाही. प्रहारची आसूड यात्रा ही शेतकरी कट्टरवादाच्या धोरणाची सुरवात आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकरी शेतमजूर, दिव्यांग निराधार बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. कडू यांनी भाजपाच्या धोरणावर सडकून टीका केली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष शेतकºयांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात येत असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तूर सोयाबीन हरबरा आदी पिकांना बाजाराभाव मिळत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी अजून शेतकºयांच्या घरात तूर पडून आहे. बोंडअळीची नुकसानभरपाई अद्याप मिळलेली नाही. पीककर्जासाठी बँक शेतकºयांना उभे करत नाही. अशा अवस्थेत पेरण्या कशा कराव्यात असा प्रश्न शेतकºयांसमोर असताना सरकार मात्र फक्त घोषणा करण्यात मग्न आहे. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्या सोडविल्या नाही तर यंदा हंगामाची पेरणी करण्याऐवजी आम्ही भाजपाचीच पेरणी करणार आणि शेतात पीक लावण्याऐवजी भाजपचे झेंडे लावणार असल्याचेही आ. कडू यांनी यावेळी सांगितले. विदर्भाच्या अनुशेषाबाबत बोलताना आ.कढू म्हणले की, आज राज्याचे सर्व महत्वाचे मंत्रीपदे विदर्भाच्या नेत्यांच्या हातात आहेत. तरीसुद्धा विदर्भाच्या आरोग्य, शिक्षण, सिंचन, रस्ते, रोजगार आदी मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. नागपूर करारानुसार विदर्भाला २३ टक्के वाटा देण्यात आला, मात्र त्याची २ टक्केही पूर्तता करण्यात आली नाही. यापुढे शेतकºयासाठी कट्टरवादाचे धोरण अमलात आणण्यात येणार असून जो बळीराजाचा अवमान करेल त्याला प्रतिउत्तर देण्यात येईल, असा इशाराही आ. बच्चू कडू यांनी यावेळी दिला. या आसडू यात्रेत सर्व राज्यातून प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

भाजपा नेत्यांना स्मरणशक्तीची कॅप्सुल देणार

शेतकरी संकटात असताना भाजपा सरकार साखर, हरबरा, वटाणा आयात करीत आहे. त्यांचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे. याशिवाय महागाई वाढत असून पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली, मात्र आज त्यांना आपल्याच विधानांचा विसर पडला आहे, त्यासाठी भाजपच्या मंत्र्यांना समरणशक्तीची कॅप्सूल देणार असल्याचा उपरोधिक टोलाही आ. बच्चू कडू यांनी यावेळी मारला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBachhu Kaduबच्चू कडू