शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:45 IST

यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते.

 बुलडाणा : भाजपाचे नेते शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषेत विधान करून अवमान करीत आहेत. यावरून भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. मात्र यापुढे शेतकऱ्यांचा अवमान सहन करून घेणार नाही. प्रहारची आसूड यात्रा ही शेतकरी कट्टरवादाच्या धोरणाची सुरवात आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकरी शेतमजूर, दिव्यांग निराधार बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. कडू यांनी भाजपाच्या धोरणावर सडकून टीका केली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष शेतकºयांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात येत असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तूर सोयाबीन हरबरा आदी पिकांना बाजाराभाव मिळत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी अजून शेतकºयांच्या घरात तूर पडून आहे. बोंडअळीची नुकसानभरपाई अद्याप मिळलेली नाही. पीककर्जासाठी बँक शेतकºयांना उभे करत नाही. अशा अवस्थेत पेरण्या कशा कराव्यात असा प्रश्न शेतकºयांसमोर असताना सरकार मात्र फक्त घोषणा करण्यात मग्न आहे. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्या सोडविल्या नाही तर यंदा हंगामाची पेरणी करण्याऐवजी आम्ही भाजपाचीच पेरणी करणार आणि शेतात पीक लावण्याऐवजी भाजपचे झेंडे लावणार असल्याचेही आ. कडू यांनी यावेळी सांगितले. विदर्भाच्या अनुशेषाबाबत बोलताना आ.कढू म्हणले की, आज राज्याचे सर्व महत्वाचे मंत्रीपदे विदर्भाच्या नेत्यांच्या हातात आहेत. तरीसुद्धा विदर्भाच्या आरोग्य, शिक्षण, सिंचन, रस्ते, रोजगार आदी मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. नागपूर करारानुसार विदर्भाला २३ टक्के वाटा देण्यात आला, मात्र त्याची २ टक्केही पूर्तता करण्यात आली नाही. यापुढे शेतकºयासाठी कट्टरवादाचे धोरण अमलात आणण्यात येणार असून जो बळीराजाचा अवमान करेल त्याला प्रतिउत्तर देण्यात येईल, असा इशाराही आ. बच्चू कडू यांनी यावेळी दिला. या आसडू यात्रेत सर्व राज्यातून प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

भाजपा नेत्यांना स्मरणशक्तीची कॅप्सुल देणार

शेतकरी संकटात असताना भाजपा सरकार साखर, हरबरा, वटाणा आयात करीत आहे. त्यांचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे. याशिवाय महागाई वाढत असून पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली, मात्र आज त्यांना आपल्याच विधानांचा विसर पडला आहे, त्यासाठी भाजपच्या मंत्र्यांना समरणशक्तीची कॅप्सूल देणार असल्याचा उपरोधिक टोलाही आ. बच्चू कडू यांनी यावेळी मारला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBachhu Kaduबच्चू कडू