शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:45 IST

यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते.

 बुलडाणा : भाजपाचे नेते शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषेत विधान करून अवमान करीत आहेत. यावरून भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. मात्र यापुढे शेतकऱ्यांचा अवमान सहन करून घेणार नाही. प्रहारची आसूड यात्रा ही शेतकरी कट्टरवादाच्या धोरणाची सुरवात आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकरी शेतमजूर, दिव्यांग निराधार बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. कडू यांनी भाजपाच्या धोरणावर सडकून टीका केली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष शेतकºयांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात येत असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तूर सोयाबीन हरबरा आदी पिकांना बाजाराभाव मिळत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी अजून शेतकºयांच्या घरात तूर पडून आहे. बोंडअळीची नुकसानभरपाई अद्याप मिळलेली नाही. पीककर्जासाठी बँक शेतकºयांना उभे करत नाही. अशा अवस्थेत पेरण्या कशा कराव्यात असा प्रश्न शेतकºयांसमोर असताना सरकार मात्र फक्त घोषणा करण्यात मग्न आहे. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्या सोडविल्या नाही तर यंदा हंगामाची पेरणी करण्याऐवजी आम्ही भाजपाचीच पेरणी करणार आणि शेतात पीक लावण्याऐवजी भाजपचे झेंडे लावणार असल्याचेही आ. कडू यांनी यावेळी सांगितले. विदर्भाच्या अनुशेषाबाबत बोलताना आ.कढू म्हणले की, आज राज्याचे सर्व महत्वाचे मंत्रीपदे विदर्भाच्या नेत्यांच्या हातात आहेत. तरीसुद्धा विदर्भाच्या आरोग्य, शिक्षण, सिंचन, रस्ते, रोजगार आदी मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. नागपूर करारानुसार विदर्भाला २३ टक्के वाटा देण्यात आला, मात्र त्याची २ टक्केही पूर्तता करण्यात आली नाही. यापुढे शेतकºयासाठी कट्टरवादाचे धोरण अमलात आणण्यात येणार असून जो बळीराजाचा अवमान करेल त्याला प्रतिउत्तर देण्यात येईल, असा इशाराही आ. बच्चू कडू यांनी यावेळी दिला. या आसडू यात्रेत सर्व राज्यातून प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

भाजपा नेत्यांना स्मरणशक्तीची कॅप्सुल देणार

शेतकरी संकटात असताना भाजपा सरकार साखर, हरबरा, वटाणा आयात करीत आहे. त्यांचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे. याशिवाय महागाई वाढत असून पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली, मात्र आज त्यांना आपल्याच विधानांचा विसर पडला आहे, त्यासाठी भाजपच्या मंत्र्यांना समरणशक्तीची कॅप्सूल देणार असल्याचा उपरोधिक टोलाही आ. बच्चू कडू यांनी यावेळी मारला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBachhu Kaduबच्चू कडू