शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:45 IST

यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते.

 बुलडाणा : भाजपाचे नेते शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषेत विधान करून अवमान करीत आहेत. यावरून भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. मात्र यापुढे शेतकऱ्यांचा अवमान सहन करून घेणार नाही. प्रहारची आसूड यात्रा ही शेतकरी कट्टरवादाच्या धोरणाची सुरवात आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्याला यापुढे घरात घुसून मारू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकरी शेतमजूर, दिव्यांग निराधार बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २५ मे रोजी बुलडाणा शहरात दाखल झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. कडू यांनी भाजपाच्या धोरणावर सडकून टीका केली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष शेतकºयांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात येत असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तूर सोयाबीन हरबरा आदी पिकांना बाजाराभाव मिळत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी अजून शेतकºयांच्या घरात तूर पडून आहे. बोंडअळीची नुकसानभरपाई अद्याप मिळलेली नाही. पीककर्जासाठी बँक शेतकºयांना उभे करत नाही. अशा अवस्थेत पेरण्या कशा कराव्यात असा प्रश्न शेतकºयांसमोर असताना सरकार मात्र फक्त घोषणा करण्यात मग्न आहे. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्या सोडविल्या नाही तर यंदा हंगामाची पेरणी करण्याऐवजी आम्ही भाजपाचीच पेरणी करणार आणि शेतात पीक लावण्याऐवजी भाजपचे झेंडे लावणार असल्याचेही आ. कडू यांनी यावेळी सांगितले. विदर्भाच्या अनुशेषाबाबत बोलताना आ.कढू म्हणले की, आज राज्याचे सर्व महत्वाचे मंत्रीपदे विदर्भाच्या नेत्यांच्या हातात आहेत. तरीसुद्धा विदर्भाच्या आरोग्य, शिक्षण, सिंचन, रस्ते, रोजगार आदी मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. नागपूर करारानुसार विदर्भाला २३ टक्के वाटा देण्यात आला, मात्र त्याची २ टक्केही पूर्तता करण्यात आली नाही. यापुढे शेतकºयासाठी कट्टरवादाचे धोरण अमलात आणण्यात येणार असून जो बळीराजाचा अवमान करेल त्याला प्रतिउत्तर देण्यात येईल, असा इशाराही आ. बच्चू कडू यांनी यावेळी दिला. या आसडू यात्रेत सर्व राज्यातून प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

भाजपा नेत्यांना स्मरणशक्तीची कॅप्सुल देणार

शेतकरी संकटात असताना भाजपा सरकार साखर, हरबरा, वटाणा आयात करीत आहे. त्यांचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे. याशिवाय महागाई वाढत असून पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली, मात्र आज त्यांना आपल्याच विधानांचा विसर पडला आहे, त्यासाठी भाजपच्या मंत्र्यांना समरणशक्तीची कॅप्सूल देणार असल्याचा उपरोधिक टोलाही आ. बच्चू कडू यांनी यावेळी मारला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBachhu Kaduबच्चू कडू