शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

चित्त्यांचे पुनर्वसन म्हणजे ७० वर्षापूर्वीच्या चुकीची दुरुस्ती - भुपेंद्र यादव

By निलेश जोशी | Updated: September 19, 2022 19:28 IST

चित्त्यांचे पुनर्वसन म्हणजे ७० वर्षापूर्वी केलेल्या चुकीची दुरूस्ती असल्याचे भुप्रेंद्र यादव यांनी म्हटले. 

 बुलढाणा : चित्यांचे पुनर्वसन हे गेल्या ७० वर्षापूर्वी पर्यावरणीयदृष्ट्या झालेल्या घोड चुकीची दुरुस्ती करून पर्यावरण संतुलन राखण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. थोडक्यात इकॉलॉजिकल राँगला इकॉलॉजिकल हार्मनीने जोडण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला गेला असल्याचे केंद्रीय कामगार, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भुपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे स्पष्ट केले. बुलढाणा येथे भाजपच्या बुथ ते प्रदेश पातळीपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या भूमिकेतून ते बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून आहेत.

सोमवारी त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना उपरोक्त भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. डॉ. संजय कुटे, माजी आ. चैनसुख संचेती, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपने दाऊदला परत आणण्याची वल्गना केली होती. परंतु दाऊदला न आणता भारतात चित्ते आणले जात आहेत, या विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उपरोक्त उत्तर दिले. 

दरम्यान, देशात ५२ टायगर रिझर्व असून या टायगर रिझर्वमधूनच देशातील २५० पेक्षा अधिक नद्यांची उगमस्थाने आहेत. नर्मदा, महानदी, कृष्णा, गोदावरीसारख्या नद्या या पट्ट्यातूनच वाहतात. पाणी हे मानवी जिवनाचा अविभाज्य भाग आहे आणि अशा नद्यांच्या काठीच मानवी सभ्यता विकसीत झाल्या. मानवी विकासासोबतच पर्यावरणीय विकास अर्थात शाश्वत विकास तितकाच महत्त्वाचा आहे. देशात आज ३५ हजार पेक्षा अधिक जैवविविधेता असलेल्या वनस्पती या जंगलामुळे सुरक्षित आहे. 

तसेच निसर्गाचे मॅकेनिझम विकसित करण्यासोबतच चित्यासारखे हिंस्त्रप्राणी (प्रेडीटर) त्यात संतुलन राखण्यास मदत करतात. वन्यजीव, जैवविविधता पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे मोठे पाऊल उचलले. आफ्रिका खंडातून भारतात आणलेल्या चित्त्यांच्या पुनर्वसनाच्या उपक्रमाचे वैश्विकस्तरावर स्वागत होत आहे. ही एक मोठी उपलब्धी असून ७० वर्षापूर्वी झालेल्या इकोलॉजिकल राँगला आता इकोलॉजिकल हारमनीमध्ये परावर्तीत करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. त्यामुळे अशा गंभीर विषय दुसऱ्या विषयाची जोडणे संयुक्तीक नसल्याचे यादव म्हणाले.

ठाकरे सरकारच्या काळात विकास कमीठाकरे सरकारच्या काळात विकास कमी झाला. त्यांची अडीच वर्षे ही त्यांचे सरकार वाचवण्यातच गेली. परंतु शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विकासाचा वेग वाढला असून बुलढाण्यासारख्या जिल्ह्यात त्याची मेडीकल कॉलेज, जिगाव प्रकल्पासह आगामी काळात जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालणा देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलली जात असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBJPभाजपाShiv Senaशिवसेना