शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भिंगारा, चाळीसटापरी, गोमाल या गावांचा मतदानावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 18:34 IST

जळगाव जामोद :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. एक महिन्यापुर्वी म्हणजे १९ मार्च रोजी या गावातील सरपंच व नागरीकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना विविध समस्यसांबाबत निवेदन देवून मतदानावर बहिष्काराबाबत सुतोवाच केले होते.भिंगारा व गोमाळ येथे लाखो रूपयाचा निधी खर्च करून इंधनावर चालणारा उर्जा प्रकल्प शासकीय निधीतून उभारण्यात आला. परंतु या प्रकल्पातून एक युनिटही उर्जा बाहेर आली नाही. परिणामी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तीन खुटी ते भिंगारा या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी खर्च झाला. परंतु रस्ता बनलाच नाही. याचीही चौकशी व्हावी आणि तीन खेटी ते भिंगारा ते चाळीसटापरी ते गोमाल असा रस्ता तयार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चाळीसटापरी व गोमाल येथे पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर लाखोचा खर्च झाला. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ती इमारत शोभेची वस्तु बनली आहे. नियमीत वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, ही सुध्दा ग्रामस्थांची मागणी आहे.शेत जमिनीचे पट्टे नियमाप्रमाणे आदिवासी बांधवांना वितरीत करावे. शाळा इमारतीच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार शोधून दोषींवर कारवाई करावी. या मागण्यांचा सुध्दा समावेश आहे. म्हणजेच आरोग्य, पाणी, रस्ता, शिक्षण, वीज व शेतजमीन पट्टे या मुख्य मागण्यांसाठी भिंगारा, चाळीसटापरी व गोपाल या तीन गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आणि तो एकजुट कायम राखीत यशस्वी करून दाखविला.

 गत दोन निवडणुकीत ७० टक्के  मतदान!सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भिंगारा मतदान केंद्रावर ६२.७८ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०.७८ टक्के मतदान करून या गावातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदविला होता. यावेळी भिंगारा (मतदान केंद्र क्रमांक ३) या मतदान केंद्रावर एकुण ११७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. परंतु यापैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. गोमाल गावाचे मतदान केंद्र क्र. ४ वर (कुंवरदेव) येथे आहे. परंतु या गावातील मतदारांनी सुध्दा मतदान केले नाही. आपली एकजुट कायम ठेवली. या बहिष्कारानंतर तरी या गावांकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. विशेष म्हणजे भिंगारा व चाळीसटापरी या गट ग्रामपंचायतीमध्ये रूख्माबाई सुरेश मुझाब्दा या महिला सरपंच आहेत. 

 पुढाºयांना गावबंदी!मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सदर ग्रामस्थांच्या समस्या ऐकुन सोडविण्याच्या दिशेने कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे पाहून त्यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेत १३ एप्रिलपासून पुढाºयांना गावबंदी केली होती. या बंदीचा फलक गावाच्या प्रवेशव्दारावरच लावण्यात आला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद