शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

भिंगारा, चाळीसटापरी, गोमाल या गावांचा मतदानावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 18:34 IST

जळगाव जामोद :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. एक महिन्यापुर्वी म्हणजे १९ मार्च रोजी या गावातील सरपंच व नागरीकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना विविध समस्यसांबाबत निवेदन देवून मतदानावर बहिष्काराबाबत सुतोवाच केले होते.भिंगारा व गोमाळ येथे लाखो रूपयाचा निधी खर्च करून इंधनावर चालणारा उर्जा प्रकल्प शासकीय निधीतून उभारण्यात आला. परंतु या प्रकल्पातून एक युनिटही उर्जा बाहेर आली नाही. परिणामी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तीन खुटी ते भिंगारा या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी खर्च झाला. परंतु रस्ता बनलाच नाही. याचीही चौकशी व्हावी आणि तीन खेटी ते भिंगारा ते चाळीसटापरी ते गोमाल असा रस्ता तयार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चाळीसटापरी व गोमाल येथे पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर लाखोचा खर्च झाला. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ती इमारत शोभेची वस्तु बनली आहे. नियमीत वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, ही सुध्दा ग्रामस्थांची मागणी आहे.शेत जमिनीचे पट्टे नियमाप्रमाणे आदिवासी बांधवांना वितरीत करावे. शाळा इमारतीच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार शोधून दोषींवर कारवाई करावी. या मागण्यांचा सुध्दा समावेश आहे. म्हणजेच आरोग्य, पाणी, रस्ता, शिक्षण, वीज व शेतजमीन पट्टे या मुख्य मागण्यांसाठी भिंगारा, चाळीसटापरी व गोपाल या तीन गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आणि तो एकजुट कायम राखीत यशस्वी करून दाखविला.

 गत दोन निवडणुकीत ७० टक्के  मतदान!सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भिंगारा मतदान केंद्रावर ६२.७८ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०.७८ टक्के मतदान करून या गावातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदविला होता. यावेळी भिंगारा (मतदान केंद्र क्रमांक ३) या मतदान केंद्रावर एकुण ११७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. परंतु यापैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. गोमाल गावाचे मतदान केंद्र क्र. ४ वर (कुंवरदेव) येथे आहे. परंतु या गावातील मतदारांनी सुध्दा मतदान केले नाही. आपली एकजुट कायम ठेवली. या बहिष्कारानंतर तरी या गावांकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. विशेष म्हणजे भिंगारा व चाळीसटापरी या गट ग्रामपंचायतीमध्ये रूख्माबाई सुरेश मुझाब्दा या महिला सरपंच आहेत. 

 पुढाºयांना गावबंदी!मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सदर ग्रामस्थांच्या समस्या ऐकुन सोडविण्याच्या दिशेने कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे पाहून त्यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेत १३ एप्रिलपासून पुढाºयांना गावबंदी केली होती. या बंदीचा फलक गावाच्या प्रवेशव्दारावरच लावण्यात आला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद