शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

आदिवासी महिलांसोबत साजरी केली भाऊबीज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:49 IST

जळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान्यता असलेल्या व्यक्ती साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो. 

ठळक मुद्देवंचितांसोबत भाऊबीजेची अकरा वर्षांची परंपरा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान्यता असलेल्या व्यक्ती साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे असेच एक आगळे व्यक्तीमत्व. गत अकरा वर्षापासून दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी महिलांमध्ये जावून हा ‘भाऊ’ भाऊबीज साजरी करतो आणि ओवाळणी म्हणून त्यांना जीवनोपयोगी एखादी वस्तू भेट देतो.शनिवारी भाऊबिजेच्या दिवशी सुबोध सावजी यांनी जळगाव जामोद तालुक्यातील विकासापासून कोसोदूर असलेल्या चाळीसटापरी, मोठे गोमाल व छोटे गोमाल या आदिवासी गावात जावून भाऊबीज साजरी केली. या गावातील सर्व महिलांनी सुबोध सावजी व त्यांच्या समवेत असणार्‍या सर्व प्रतिष्ठितांना परंपरागत पध्दतीने ओवाळले. यावेळी आदिवासी महिलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले मनात आनंदाची लहर निर्माण झाली. आणि कोणीतरी दिग्गज भाऊ आपल्या पाठीशी उभा आहे. या भावनेतून जगण्याची हिम्मतही वाढली. सुबोध सावजी यांनी यापूर्वी सायखेड, भिंगारा, जनुना या आदिवासी गावांमध्ये रक्षाबंधन व भाऊबीज साजरी केली आहे. तर अ.भा.काँग्रेस कमिटीचे चिटणीस आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी चाळीस टापरी व गोमाल या आदिवासी गावात १७ वर्षापासून संपर्क ठेवत वैद्यकीय मदत, अन्नदान व दिवाळी भेट दिली आहे. त्याचीही प्रशंसा हे आदिवासी बांधव मुक्तकंठाने करतात.

ओवाळणीत दिली ब्लँंकेटची भेटचाळीस टापरी व दोन्ही गोमाल येथील सर्व आदिवासी भगिनींना सुबोध सावजी यांनी उलनच्या ब्लॅकेंटची भेट दिली. सुमारे पावणे दोनशे कुटूंबातील भगिनींना या जीवनाश्यक वस्तूची भेट मिळाल्याने या भगिनींसह त्यांच्या कुटुंबीयांच्याही चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. याशिवाय या गावाच्या काही गरजा भागविण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचनही सुबोध सावजी यांनी यावेळी दिले. या नावीण्यपूर्ण भाऊबीजप्रसंगी वा.रा.पिसे, अर्जुन घोलप, अबरार खान मिल्ली, अरुण ताडे, माया धाडे, चंद्रकांत माने, पांडूरंग ताडे, गणेश उमरकर, शमीम देशमुख आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :diwaliदिवाळी