शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांसाठी भारिपचे धरणे

By admin | Updated: June 7, 2014 00:18 IST

संग्रामपूर तालुक्यातील समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे

संग्रामपूर : तालुक्यातील विविध समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने विविध समस्यांसाठी आज ६ जून रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांच्या समस्या, शेतकरी, शेतमजुरांचा त्यांच्या प्रश्नांसाठी भारिप-बमसंने एल्गार पुकारला.सोनाळा गावातील अतिक्रमण हटवून गरीबांच्या घरांचे नुकसान केले त्यांना आर्थिक भरपाई देवून जागेचे कायम पट्टे देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेचे अनुदान दीड लाख रुपये करण्यात यावे, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वाढवून २ हजार रुपये करण्यात यावे, विभक्त कुटुंबांना त्वरित विभक्त रेशनकार्ड देण्यात यावे, शेतकरी शेतमजुरांना मासिक २000 रु. पेन्शन देण्यात यावे, शासकीय कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात यावी आदी १३ मागण्यांसाठी सदर धरणे आंदोलन होते. यावेळी देविदास दामोदर, तेजराव इंगळे, प्रल्हाद दातार, दशरथ सुरडकर, वसुलकर काका, रवींद्र भेलके, हुसेनभाई, दशरथ लोणकर, वसंतराव पाटील, चेतन पाटील, दिनकरराव दाभाडे, भारत वानखडे, अरुण निंबोळकार, विजय पहुरकर, उत्तम उमाळे, गौतम इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार काझी व नायब तहसीलदार दाभाडे यांनी धरणे मंडपात येऊन आंदोलनकर्त्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. या धरणे आंदोलनात संग्रामपूर तालुक्यातील ५00 च्या वर महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीराम बांगर यांनी केले.