शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘भगवत गीता दु:खापासून मुक्ती देण्याचे एकमेव साधन!’ -  मदन सुंदरदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:08 IST

मनुष्य  जीवनात पैसा कमविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडतो. मात्र, पैसा मिळाल्यानंतर तो आनंद घेवू शकत नाही.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: जगातले सगळेच धर्म महान आहेत. प्रत्येक धर्म सत्य आणि चांगल्या कमार्चीच शिकवणूक देत असतो. पण मानव त्या धर्माच्या धर्मग्रंथांमधल्या गोष्टींचं योग्य पालन करत नाही, आणि चुकीच्या दिशेनं जाऊ लागतो. चुकीच्या दिशेनं जाणाºया व्यक्तीला घडविण्यासाठी इस्कॉन ही संस्था  प्रयत्नशील आहे. ‘ इस्कॉन’चे मदनसुंदर दास यांच्याशी साधलेला संवाद.

तणावमुक्त समाजासाठी ‘इस्कॉन’च्या प्रयत्नांबाबत काय सांगाल?प्रत्येक मनुष्याच्या जीवनात संकट येत असतात. संकटातून योग्य अर्थ काढला पाहीजे. संकटकाळी बुध्दीचा वापर केल्यास दु:ख आणि गोंधळातूनही मनुष्याला चांगला मार्ग सापडतो. अर्जुनाला दु:ख आणि द्विधा मनस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवत गीता सांगितली. भगवत गीता ही दु:खापासून मुक्ती देण्याचं प्रमुख साधन आहे. हे पटवून देण्यासाठी ‘इस्कॉन’ही संस्था झटत आहे.

समाजात संस्कार रूजविण्यासाठी ‘इस्कॉन’चे योगदान काय ?समाजातील प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधात धडपडत आहे. परंतु, खरे सुख कशात आहे, याची जाणिव त्याला नाही. त्यामुळे अनेक मनुष्य आपलं अनमोल आयुष्य व्यर्थ घालवित आहेत. संस्कार आणि नितिमुल्य रुजविण्यासाठी गीता जयंतीच्या पर्वावर देशात एकाचवेळी भगवत् गीतेतील विविध अध्यायांवर आधारीत स्पर्धा घेत, विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृती केली जाते.

भगवत गीतेला विज्ञाननिष्ठ मानता येईल का?  निश्चितच...भगवत गीता केवळ एका धर्माचा ग्रंथ नाही. श्रीमद् भगवत गीतेत कर्मयोग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा कर्मयोग माणसाला विज्ञानाचे माहात्म्य सांगतो. एकीकडे विधात्यावर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन गीतेत आहे, तर दुसरीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकवला जातो. त्यामुळे भगवत गीता ही विज्ञाननिष्ठ आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, इर्षा हे सहा विकार माणसाला बाहेरून त्रास देतात. तर इच्छा माणसाला आतून त्रास देते. या सहा विकारांच्या ताब्यात गेलेले मन व शरीर निरोगी राहीलच कसे?सहा विकारांवर विजय मिळवणे सोपे नाही. पण आपले मन ताब्यात राहिले. तरच मनावरचा ताण अपोआप हलका होतो.

 ‘इस्कॉन’शी आपण केव्हापासून जुळलात?अमेरिकेतील ओहियो स्टेट विद्यापीठातून इलेक्ट्रीकल आणि कम्प्युटर इंजीनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळविली. त्यानंतर जुनिपर नेटवर्क, युएसए येथे इंजिनीअरम्हणून काम केले. या कालावधीत सन २०११ मध्ये शोध प्रबंधांसाठी प्रतिष्ठित ‘कर्मचारी उत्कृष्टता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. दरम्यान, भगवत गीतेतील संदेश आणि इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्याने प्रेरीत झाल्याने मायदेशी म्हणजे भारतात परत आलो. सन २०१२ मध्ये वैदीक कला आणि विज्ञानाचे पूर्णकालिक विद्यार्थी म्हणून इस्कॉनमध्ये सहभागी झालो. इस्कॉनशी जुळल्यानेच आपल्याला स्व:तची खरी ओळख झाली. त्यामुळे इस्कॉनशी जुळल्याचा मनस्वी आनंद आहे. अज्ञानामुळेच मनुष्य भेदा-भेद पाळत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिकinterviewमुलाखत