शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्यावर विहिरीची नोंद नसूनही योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:08 IST

३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांच्या आर्थीक उन्नतीसाठी एकीकडे शासन विविध कल्याणकारी योजना आखते. मात्र योजनांच्या नावावर अधिकाºयांना हाताशी धरून ठिबक सिंचन योजनेमध्ये आर्थीक लाभासाठी दिशाभूल करीत अनेकांनी लाखोचा मलिदा लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतरही त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अनुदानावर प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व स्प्रिंकलर उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये जिल्हयात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना २०१२- १३ पासून सुरु झाली आहे. ठिबक, तुषार सिंचन करू इच्छिणाºया शेतकºयांसाठी अनुदानतत्वावर ही योजना राबविली जाते. आॅ़नलाईनद्वारे अर्ज केल्यानंतर अनुदान मंजूर झालेल्या शेतकºयाने तालुका कृषी अधिकाºयाची पूर्व संमती मिळाल्यानंतर तालुक्यातील किंवा जिल्हयातील नोंदणीकृत वितरकाकडून ठिबक, तुषार संच बसवायचा असतो. त्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावयाचा असतो. पात्र शेतकºयांना अनुदान मिळाले नाही मात्र ज्यांनी साटेलोटे करीत एकदा लाभ घेतला असताना परत दुसºया, तिसºया वर्षी सातत्याने लाभ घेतल्याचेही दिसून येते. प्रामुख्याने संग्रामपूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, मलकापूर तालुक्यात हा प्र्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांनी दिली. या योजनेसाठी अनेक शेतकºयांनी आॅ़नलाईन अर्ज सादर केले.यापैकी विशिष्ट अनुदानासाठी ट्क्केवारी ठरल्यानंतर काहींचेच पात्र ठरविण्यात आले. कृषी पर्यवेक्षकांनी कार्यालयातच बसून शिवार तपासणी केली. विशेष म्हणजे यासाठी जिओ टॅगिंगने फोटो काढून अपलोड करणे क्रमप्राप्त होते. इंटरनेटची अडचण दाखवत त्यातूनही पळवाट काढण्यात आली. फोटो असल्याशिवाय प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही ही अट असताना याकडे मात्र तालुका कृषी अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळेच अनेक शेतकरी लाभार्थ्यांना हाताशी धरून कृषी विभागातील काही कर्मचारी व अधिकाºयांनी शासनाची दिशाभूल केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे बाजारभावानुसार ३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत. आर्थीक लाभ देणाºया शेतकºयांचे प्रस्ताव निकाली लावून उर्वरीत शेतकºयांना मात्र प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

आमच्या अधिकाºयांकडून योजनेचा लाभ नियमातच दिला असेल. पण काही ठिकाणी गैरप्रकार झाला असल्यास त्याची चौकशी केल्याशिवाय नेमके सांगता येणार नाही.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना