शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सातबाऱ्यावर विहिरीची नोंद नसूनही योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:08 IST

३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांच्या आर्थीक उन्नतीसाठी एकीकडे शासन विविध कल्याणकारी योजना आखते. मात्र योजनांच्या नावावर अधिकाºयांना हाताशी धरून ठिबक सिंचन योजनेमध्ये आर्थीक लाभासाठी दिशाभूल करीत अनेकांनी लाखोचा मलिदा लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतरही त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अनुदानावर प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व स्प्रिंकलर उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये जिल्हयात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना २०१२- १३ पासून सुरु झाली आहे. ठिबक, तुषार सिंचन करू इच्छिणाºया शेतकºयांसाठी अनुदानतत्वावर ही योजना राबविली जाते. आॅ़नलाईनद्वारे अर्ज केल्यानंतर अनुदान मंजूर झालेल्या शेतकºयाने तालुका कृषी अधिकाºयाची पूर्व संमती मिळाल्यानंतर तालुक्यातील किंवा जिल्हयातील नोंदणीकृत वितरकाकडून ठिबक, तुषार संच बसवायचा असतो. त्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावयाचा असतो. पात्र शेतकºयांना अनुदान मिळाले नाही मात्र ज्यांनी साटेलोटे करीत एकदा लाभ घेतला असताना परत दुसºया, तिसºया वर्षी सातत्याने लाभ घेतल्याचेही दिसून येते. प्रामुख्याने संग्रामपूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, मलकापूर तालुक्यात हा प्र्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांनी दिली. या योजनेसाठी अनेक शेतकºयांनी आॅ़नलाईन अर्ज सादर केले.यापैकी विशिष्ट अनुदानासाठी ट्क्केवारी ठरल्यानंतर काहींचेच पात्र ठरविण्यात आले. कृषी पर्यवेक्षकांनी कार्यालयातच बसून शिवार तपासणी केली. विशेष म्हणजे यासाठी जिओ टॅगिंगने फोटो काढून अपलोड करणे क्रमप्राप्त होते. इंटरनेटची अडचण दाखवत त्यातूनही पळवाट काढण्यात आली. फोटो असल्याशिवाय प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही ही अट असताना याकडे मात्र तालुका कृषी अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळेच अनेक शेतकरी लाभार्थ्यांना हाताशी धरून कृषी विभागातील काही कर्मचारी व अधिकाºयांनी शासनाची दिशाभूल केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे बाजारभावानुसार ३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत. आर्थीक लाभ देणाºया शेतकºयांचे प्रस्ताव निकाली लावून उर्वरीत शेतकºयांना मात्र प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

आमच्या अधिकाºयांकडून योजनेचा लाभ नियमातच दिला असेल. पण काही ठिकाणी गैरप्रकार झाला असल्यास त्याची चौकशी केल्याशिवाय नेमके सांगता येणार नाही.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना