शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कचऱ्याच्या ढिगावर बेलाड वासीयांनी केली दिवाळी साजरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 15:36 IST

दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.  

मलकापूर : दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.  

मागील दोन महिन्यापासून बेलाड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक असलेलं डम्पिंग ग्राऊंड त्वरित हटविण्यात यावे व झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी लढाई लढत आहे. याकरिता न. प. प्रशासनाला व तहसीलदारांना वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. 

दिवाळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थांनी दिवाळी या सणावर बहिष्कार टाकून डंपिंग ग्राउंडवर दिवाळी साजरी केली. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी सुनील  संबारे, श्रीकृष्ण संबारे, इच्छाराम संबारे, राहुल संबारे, दीपक चोखंडे, गणेश दहिभाते, सोमेश्वर संबारे, हनुमान भगत, सागर संबारे, गजानन संबारे, दुर्गेश जंगले, सचिन संबारे, पवन संबारे, अमोल संबारे, मनोज संबारे, गणेश संबारे,अनिल केने, प्रशांत संबारे, निलेश संबारे, शिवाजी केने, अमृत संबारे, रामा संबारे यांनी सहभाग घेतला. 

असा दुजाभाव कशासाठी? 

नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बेलाड कॉटन मार्केट समोर राहणाऱ्या नाथ जोगी समाजाचे लोक यांना वीजपुरवठा व्हावा याकरिता विद्युत वितरण कंपनीमध्ये दिवाळी साजरी केली. परंतु त्या समाजाच्या लोकांसाठी  विद्युत पुरवठा व्हावा हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. डम्पिंग ग्राऊंड हा त्यांच्यासाठी तितकाच गंभीर प्रश्न आहे. नऊ-दहा 2018 ला नगरपरिषद प्रशासनाला डम्पिंग ग्राउंड विरोधात निवेदन देताना नाथ जोगी समाजाचे लोक उपस्थित होते. नाथ जोगी समाजाचे लोक जिथे राहतात त्यांच्या घराच्या 100 मीटर अंतरावरच हे डम्पिंग ग्राऊंड वसवलेलं आहे. नगराध्यक्ष अॅ. हरीश रावळ या प्रकरणाबाबत दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला. 

आरोग्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष! 

भराडी लोकांसह बेलाड ग्रामस्थ व इतर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाच हजार लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही हरीश रावळ गप्प का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आम्हा बेलाड वाशीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही सण साजरा करणार नाही असे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसाच्या आत प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात विराट एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीbuldhanaबुलडाणा