शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

‘ब्युटी विथ ब्रेन’ सौंदर्य स्पर्धेचा गाभा! - गितांजली भोसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 19:14 IST

प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले.

- सोहम घाडगे 

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: सौंदर्य स्पर्धेत केवळ सुंदरता बघितली जाते असा समज आहे. वास्तविक परिस्थिती तशी नसून सौंदर्यासोबत गुणवत्ता तितकीच महत्वपूर्ण आहे. विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धक कशाप्रकारे उत्तरे देतो यावरुन त्याच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. एकंदर परिस्थितीशी जुळवून घेण्याची  त्याची क्षमता, प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले. प्रगती वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आल्या असता २३ नोव्हेंबर रोजी त्याच्यांशी साधलेला संवाद...

सौंदर्य स्पर्धेकडे कशा वळल्या?

आरोग्यासाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे. शरीर निरोगी असल्यास आपोआप सौंदर्य खुलते. योगाभ्यास, योगातज्ञ म्हणून काम करीत असतांना सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तयारी करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. अल्पावधीत म्हणजे केवळ २० दिवसांमध्ये तयारी केली. परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धेत यश मिळाले. सौंदर्य स्पर्धेतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

सैन्यातील महिलांसाठी काम करताना अनुभव कसा आहे ?

सैन्यातील अधिकारी, जवान यांच्या कुटूंबातील महिलांसाठी काम करतांना खरच खूप आनंद मिळतो. स्वत: सैनिक कुटूंबातील असल्याने या महिलांबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, मनोरंजन, कला आदी उपक्रम राबवितांना कुठेतरी मनाला समाधान मिळते.

सौंदर्य स्पर्धेत तुम्हाला विचारलेला एखादा प्रश्न आणि तुमचे उत्तर सांगा ?

सहभागी स्पर्धकांपेक्षा तुमच्यातील वेगळेपण काय असा प्रश्न परिक्षकांनी विचारला. त्यावर मी आर्मीतील महिलांसाठी करीत असलेले काम इतरांपेक्षा प्लस पॉर्इंट असे उत्तर दिले. सौंदर्य स्पर्धेत केवळ झगमगाट असतो म्हणून येऊ नका. मेहनत, परिश्रम करण्याची तयारी ठेवा. या स्पर्धांमध्ये गुणवत्तेचा कस लागतो. मंचावर अगदी प्रामाणिक राहा. ज्या गोष्टी अवगत आहेत ते खरे -खरे सांगा. नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे दिल्यास यश तुमचेच आहे.

करिअर आणि कुटूंब याची सांगड कशी घातली ?

मी पंजाबी कुटूंबातील आहे. महाराष्ट्रीयन सैनिकी अधिकाºयाशी लग्न केल्यानंतर मराठी संस्कृतीसोबत जुळवून घेतले. पती आणि सासरचा भक्कम पाठींबा आहे. करिअरबाबत त्यांनी पूर्ण मोकळिक दिली. त्यामुळे करिअरमध्ये बेस्ट देता आले. पतीच्या नोकरीनिमित्त सध्या आम्ही हैद्राबाद येथे राहतो. सासरची मंडळी मूळची पुण्याची असली तरी हल्ली इंदौरमध्ये स्थायिक आहेत. छान कौटूंबिक वातावरण आहे. पतीने कधी भाषेचा आग्रह धरला नाही. मला मराठी उत्तम कळते. मात्र बोलता येत नाही. मराठी भाषा छान आहे.  मराठी शिकण्याला मी प्राधान्य देणार  आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत