शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

‘ब्युटी विथ ब्रेन’ सौंदर्य स्पर्धेचा गाभा! - गितांजली भोसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 19:14 IST

प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले.

- सोहम घाडगे 

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: सौंदर्य स्पर्धेत केवळ सुंदरता बघितली जाते असा समज आहे. वास्तविक परिस्थिती तशी नसून सौंदर्यासोबत गुणवत्ता तितकीच महत्वपूर्ण आहे. विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धक कशाप्रकारे उत्तरे देतो यावरुन त्याच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. एकंदर परिस्थितीशी जुळवून घेण्याची  त्याची क्षमता, प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले. प्रगती वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आल्या असता २३ नोव्हेंबर रोजी त्याच्यांशी साधलेला संवाद...

सौंदर्य स्पर्धेकडे कशा वळल्या?

आरोग्यासाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे. शरीर निरोगी असल्यास आपोआप सौंदर्य खुलते. योगाभ्यास, योगातज्ञ म्हणून काम करीत असतांना सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तयारी करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. अल्पावधीत म्हणजे केवळ २० दिवसांमध्ये तयारी केली. परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धेत यश मिळाले. सौंदर्य स्पर्धेतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

सैन्यातील महिलांसाठी काम करताना अनुभव कसा आहे ?

सैन्यातील अधिकारी, जवान यांच्या कुटूंबातील महिलांसाठी काम करतांना खरच खूप आनंद मिळतो. स्वत: सैनिक कुटूंबातील असल्याने या महिलांबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, मनोरंजन, कला आदी उपक्रम राबवितांना कुठेतरी मनाला समाधान मिळते.

सौंदर्य स्पर्धेत तुम्हाला विचारलेला एखादा प्रश्न आणि तुमचे उत्तर सांगा ?

सहभागी स्पर्धकांपेक्षा तुमच्यातील वेगळेपण काय असा प्रश्न परिक्षकांनी विचारला. त्यावर मी आर्मीतील महिलांसाठी करीत असलेले काम इतरांपेक्षा प्लस पॉर्इंट असे उत्तर दिले. सौंदर्य स्पर्धेत केवळ झगमगाट असतो म्हणून येऊ नका. मेहनत, परिश्रम करण्याची तयारी ठेवा. या स्पर्धांमध्ये गुणवत्तेचा कस लागतो. मंचावर अगदी प्रामाणिक राहा. ज्या गोष्टी अवगत आहेत ते खरे -खरे सांगा. नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे दिल्यास यश तुमचेच आहे.

करिअर आणि कुटूंब याची सांगड कशी घातली ?

मी पंजाबी कुटूंबातील आहे. महाराष्ट्रीयन सैनिकी अधिकाºयाशी लग्न केल्यानंतर मराठी संस्कृतीसोबत जुळवून घेतले. पती आणि सासरचा भक्कम पाठींबा आहे. करिअरबाबत त्यांनी पूर्ण मोकळिक दिली. त्यामुळे करिअरमध्ये बेस्ट देता आले. पतीच्या नोकरीनिमित्त सध्या आम्ही हैद्राबाद येथे राहतो. सासरची मंडळी मूळची पुण्याची असली तरी हल्ली इंदौरमध्ये स्थायिक आहेत. छान कौटूंबिक वातावरण आहे. पतीने कधी भाषेचा आग्रह धरला नाही. मला मराठी उत्तम कळते. मात्र बोलता येत नाही. मराठी भाषा छान आहे.  मराठी शिकण्याला मी प्राधान्य देणार  आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत