शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सावधान! जिल्ह्यात पुन्हा वाढतोय डेंग्यूचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:50 IST

तीन वर्षात ७८ रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र आता नागरिकांच्या निष्काळजीमुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने पुन्हा डेंग्यूचा धोका वाढला आहे. गत तीन वर्षात ७८ रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार एडीस इजिप्टी या डासांच्या मादीपासून होतो. साधारणत: जून ते आॅक्टोबर या कालावधीत याचा जास्त प्रसार होतो. कारण या कालावधीमध्ये पाऊस पडत असल्यामुळे अनुकुल वातावरण असते. हा डास तुलनेने इतर डासांपेक्षा लहान असतो. या आजारावर निश्चित असा औषधोपचार नसल्यामुळे अटकाव करणे हा एकमेव मार्ग आपल्या हातात आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. परिसरात असलेला केरकचरा एकत्रिक करून जाळून नष्ट करणे. डबकी असल्यास ती त्वरी बुजविणे. आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ करत कोरडा दिवस पाळणे यासह इतर काही उपाययोजना केल्यास या आजाराला सहजपणे प्रतिबंध घालता येऊ शकतो. जिल्ह्यात या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याने व नागरिकांनी देखील काळजी घेत आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन केल्याने हा आजार आटोक्यात आला होता. २०१७ मधील डेंग्यूच्या रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास हा आकडा केवळ ४ वर आला होता.मात्र नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका वाढला असून २०१८ मध्ये ३६ तर २०१९ मध्ये ३८ असे एकुण तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७८ रुग्णांची भर पडली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक नसून चिंता वाढविणारी आहे.नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यावर होते. त्यामुळे स्वत: लक्ष घालून घरातील पाण्याची भांडी स्वच्छ करावी व पाण्यामध्ये डासांच्या अळ्या नसल्याची खात्री करावी. जेणेकरून या आजारापासून बचाव करणे शक्य होईल.- एस. बी. चव्हाण,जिल्हा हिवताप अधिकारी.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू