शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गेल्यावर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना १,१२१ कोटी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : गेल्यावर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना १,१२१ कोटी ४० लाख रुपयांची पीककर्ज माफी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर बँकांनीही जिल्ह्यात २०१६नंतरचे विक्रमी पीककर्ज वाटप केले आहे. परिणामी कोरोना संकटाच्या काळात जेथे सर्व अर्थकारण ठप्प झाले होते, तेथे कृषी क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थकारणाला चांगला हातभार लावल्याचे आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्यावर्षी २ लाख १९ हजार ७८२ शेतकऱ्यांना २ हजार ७३३ कोटी ७२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे वार्षिक पतआराखड्यांतर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी खरीप व रब्बी मिळून जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७४१ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार ४८४ कोटी १७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. एकूण उद्दिष्टाच्या ते ५४ टक्के होते. परिणामी २०१७नंतरचे हे विक्रमी पीककर्ज वाटप म्हणावे लागले.

यामध्ये खरीप हंगामात २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपये पीककर्ज १ लाख ७९ हजार ४७१ शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार २६० कोटी ५४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बी हंगामात ४० हजार ३११ शेतकऱ्यांना २७३ कोटी ३७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी २६ हजार ७८६ शेतकऱ्यांना बँकांनी २२३ कोटी ६३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बीच्या एकूण उद्दिष्टाच्या ८२ टक्के वाटप यंदा झालेले आहे. जिल्ह्याचा एकंदरीत विचार करता, २०१५-१६ या आर्थिक वर्षानंतर प्रथमच पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा उच्चांक करण्यात आला आहे. ही औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागले.

--सहा वर्षांत वाटप झालेले पीककर्ज--

वर्षे कर्जवाटप (टक्केवारी)

२०१५-१६ ८७.१० टक्के

२०१६-१७ ७९.३९ २०१७-१८ २६.१३ २०१८-१९ ३१.७९ २०१९-२० २६.७९ २०२०-२१ ५४.०० टक्के

--कर्जमुक्तीचा लाभ मिळालेले शेतकरी--

जिल्ह्यात १,६९,५९६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. ११२१.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती आतापर्यंत या शेतकऱ्यांना मिळाली. २५ हजार शेतकरी अद्यापही कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तर ५,३०० शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणिकरण रखडले आहे.