शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

फळबाग योजनेतून केळी गायब

By admin | Updated: November 30, 2014 23:11 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान प्रक्रिया सुरु करण्याची मागणी.

संग्रामपूर (बुलडाणा) : खारपाणपट्यातील शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी कृषी विभागाकडून फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेत केळी पिकाचे बुलडाणा जिल्ह्याला लक्ष्यांकच देण्यात आले नाही. याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात नव्या सरकारने सकारात्मक निर्णय घेवून पूर्वीसारखे अनुदान सुरु करुन केळी पिकाच्या लागवडीला चालना द्यावी अशी अपेक्षा आहे.जिल्ह्याला या अगोदर केळी पिकाच्या लागवडीसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून इतर फळ पिकासारखे अनुदानाची तरतूद होती. केळी लागवडीचे जिल्ह्यातून जळगाव जा. आणि संग्रामपूर या दोन तालुक्यातच क्षेत्र जास्त आहे. म्हणून लक्ष्यांक ही या दोन तालुक्यासाठीच दिले जात होते. संग्रामपूर तालुक्यात ४0 ते ५0 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. या पिकाच्या उत्पादनासाठी पाणी व खर्च भरपूर लागत असल्याने या पिकाकडे शेतकर्‍यांचा नकारात्मक दृष्टीकोण होता. मात्र शासनाने या पिकासाठी अनुदानाची तरतूद करुन नवीन लागवडीचे क्षेत्र वाढीसाठी मदत केली. त्याकरिता टिश्युकल्चर वाण शेतकर्‍यांच्या हातात आल्याने एकट्या संग्रामपूर तालुक्यात आज जवळपास १00 ते १२0 हेक्टर क्षेत्रामध्ये टिश्यु केळीची लागवड झालेली आहे. हा भाग खारपाणपट्यात येत असल्याने सिंचनासाठी शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यास केळी उत्पादनाच्या बाबतीत हा भाग अग्रेसर ठरेल अशी भौगोलिक स्थिती आहे. नवनव्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी या भागामध्ये विशेष बाब म्हणून मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत फलोत्पादन कार्यक्रमही राबविण्यात आला. जळगाव आणि संग्रामपूर हे दोन तालुके केळी पिकासाठी योग्य असल्याने नव्या सरकारकडून याचा विचार व्हावा. केळीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता काकणवाडा गावात केळी उत्पादकांनी पहिली शेतमाल विक्रीची कंपनी स्थापन करुन या भागातील शेतकर्‍यांसाठी नवी आशा निर्माण करण्याचे काम केले. सोबतच याच केळी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणीचाही मोठी संधी आहे. त्यासाठी केळी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरुन अनुदान प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी होत आहे.