शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बैलजोडी चोरीच्या आरोपावरून दाम्पत्यासह मुलास मारहाण

By admin | Updated: June 5, 2017 02:26 IST

२१ जणांवर अँट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : रूईखेड मायंबा येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील गोठय़ातून बैलजोडी चोरून नेल्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून येथील पती, पत्नी व मुलास रूईखेडमधील काही लोकांनी मारहाण केली. या घटनेत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रूईखेडमधील २१ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितावर अँट्रॉसिटी अँक्टखाली ३ जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. बुलडाणा तालुक्यातील रूईखेड मायंबा या गावातील फिर्यादी राधाबाई गुलाबराव उंबरकर (वय ५0) या महिलेने धाड पोलिसात तक्रार दिली, की २ जून रोजी रात्री ८.३0 च्या सुमारास रूईखेड गावाकडे घरी जाताना वाटेत, आरोपी सुखराम रामराव उगले, विजय तेजराव उगले व इतर १९ जणांनी मला व पतीस आणि मुलास बैलजोडी चोरण्याच्या आरो पावरून लाठय़ाकाठय़ांनी मारहाण करत विनयभंग केला. सोबत मारहाण करून जातीवाचक शिव्या देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर कलम १४३, ३५४, ३५४ (ख), ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, २९४, ५0६ तसेच २, ३, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार १९८९ नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेतील २१ आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. मारहाणीत जखमी राधाबाई उंबरकर व रवींद्र उंबरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुखराम उगले यांनी धाड पोलिसात तक्रार दिली, की आरोपी रवींद्र गुलाबराव उंबरकर, राधाबाई उंबरकर आणि गुलाबराव उंबरकर यांनी माझ्या शेतातील गोठय़ातून बैलजोडी चोरण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना प्रत्यक्ष पकडले, विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपींवर कलम ३८0, ४५७, ५११ भादंवि नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी एसडीपीओ बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. तपास बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील, एएसआय गजानन मुंढे, ना.पो.कॉ. प्रकाश दराडे, माधव कुटे, विजय मेहेत्रे, गजानन मोरे, दशरथ शितोळे, बळीराम खंडागळे हे करत आहे.