शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१५ ऑगस्टच्या ग्रामसभा शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 11:06 IST

Khamgaon News : यावर्षी ग्रामसभा घ्यायच्या  की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.  

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  १५ ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील वर्षीचे गावाच्या विकासाचे तसेच आर्थिक नियोजन करण्यात येते; मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी ग्रामसभा घ्यायच्या  की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.  १५ ऑगस्ट रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत गतवर्षी आढावा घेण्यात येतो, तसेच पुढील वर्षीचे आर्थिक नियोजनही करण्यात येते. पुढील गावात करावयाची विकास कामे तसेच त्याकरिता लागणारा निधी याचे नियोजन करण्यात येते, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ कुणाला द्यायचा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात कोणती विकासकामे करायचा, याचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात येते. त्यामुळे ही ग्रामसभा गावाच्या विकासासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे यावर्षी ग्रामसभा घेण्याची परवानगी मिळते की नाही, या निर्णयाच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत. ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक व्हावा, या हेतूने महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा करून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश काढला. त्यामुळे ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  मागील वर्षापासून कोविड-१९ च्या प्रभावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या एकही नियमित ग्रामसभा घेतल्या गेल्या नाही. आता बुलडाणा जिल्ह्यात दररोज दहाच्या आत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियमित ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा होतात. सरपंच, सदस्य विविध ठराव पारित करीत असतात, तसेच वैयक्तिक लाभाची निवड करणे आदीबाबत अनियमितता होत आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्याची मागणी जोर धरत आहे.

गावांमध्ये ग्रामसभा घेण्याबाबत अद्याप शासनाच्यावतीने कोणतेही आदेश आले नाहीत. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आता अन्य दिवशी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र ग्रामसभा घ्यायची की नाही, याबाबत आदेश आलेले नाहीत.- चंदनसिंग राजपूत गटविकास अधिकारी, खामगाव.  

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत