शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

पीककर्ज पुनर्गठणास स्टेट बँकेची टाळाटाळ

By admin | Updated: June 6, 2015 00:55 IST

चिखली येथे शेतक-यांसह स्वाभिमानीचा बँकेत ठिय्या.

चिखली ( जि. बुलडाणा) : पेरणीचे दिवस तोंडावर आले असतानाही तालुक्यातील बँकांनी अद्यापपर्यंत पीककर्जाचे पुनर्गठण केलेले नाही. तर याबाबत शासनाचे सक्तीचे आदेश असतानाही शहरातील स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठणास टाळाटाळ होत असल्याने ५ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्रस्त शेतकर्‍यांसह स्टेट बँकेतील व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या दिला व व्यवस्थापकास घेराव घालण्यात आला. याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने येत्या ८ जूनपासून पुनर्गठणास सुरुवात करण्याचे आश्‍वासन संबंधितांनी दिले. यावर्षी तत्काळ पीक कर्जाचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी बँकांना आदेशीत केले आहे; मात्र त्याकडे तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडून होत आहे. तर पीक कर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिझवून मेटाकुटीला आला आहे. येथील स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठणासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परतून लावण्यात येत आहे. याबाबत निराश झालेल्या शेतकर्‍यांनी याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय गाठले व बँकेच्या अनागोंदी कारभाराची जाणीव करून दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वाभिमानीचे भारत वाघमारे व विनायक सरनाईक त्रस्त शेतकरी व कार्यकर्त्यांसह स्टेट बँकेत धडकले व व्यवस्थापक तागडे हे कक्षात उपस्थित नसल्यामुळे याठिकाण ठिय्या देण्यात आला. दरम्यान, बँकेत हजर झालेल्या व्यवस्थापकास स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी घेराव घालून कर्ज पुनर्गठणाबाबत धारेवर धरले. तसेच जोपर्यंत पीककर्जाचे पुनर्गठण होत नाही, तोपर्यंंत बँकेतच ठिय्या देण्याचा पावित्रा घेतल्याने व्यवस्थापक तागडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत पुनर्गठणाला सुरुवात करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.