शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दाखले काढण्यासाठी होणारी गैरसोय टाळा

By admin | Updated: June 20, 2014 23:18 IST

ओबीसी परिषदेची मागणी

जळगाव जामोद : शालेय विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामधून शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी जी ससेहोलपट होते ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलवर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करावी, अशी मागणी ओबीसी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश लहासे तथा पदाधिकार्‍यांनी केली आहे.याबाबत सोमवारी ओबीसी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. नुकतेच १0 वी, १२ वी व इतर विभागाचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्रे तहसिल तथा एसडीओ कार्यालयातून काढावी लागतात आणि त्यासाठी कालावधीसुध्दा कमी असतो. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण होवून विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळू शकत नाहीत. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. तेव्हा याबाबत गंभीर दखल घेवून तहसीलमधील नक्कल विभाग व इतर संबंधीत टेबलवर कर्मचार्‍यांची संख्या वाढवून स्वतंत्र यंत्रणा ठराविक काळासाठी तयार करावी जेणेकरुन विद्यार्थ्यांना कमी वेळात प्रमाणपत्रे उपलब्ध होतील. तसेच या काळात होणार्‍या गर्दीचा फायदा घेवून सेतू कार्यालयामार्फत आर्थीक पिळवणूक सुध्दा केली जाते. हे थांबविण्यासाठी सेतू संचालकांना सुध्दा आदेश द्यावेत व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदनावर राजेश लहासे यांच्यासह तालुकाध्यक्ष अमोल वानखडे व इतर पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत. तसेच या कालावधीमध्ये स्वतंत्र यंत्रणा बसविणे संदर्भात लवकरात लवकर सूचना कराव्यात अन्यथा ओबीसी परिषदेतर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.