शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

मेहकर तालुक्यात शेततळ्यांमुळे १२ कोटी लीटर पाण्याची उपलब्धता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी ...

ठळक मुद्देसंरक्षित शेती सिंचनासाठी सोयशेततळी आणि शाश्‍वत सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकावर, तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांसाठी  ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यापूर्वी झालेला शेततळय़ांच्या कामामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाला असून, उत्पादनात काही प्रमाणात शाश्‍वतता आली आहे. आतापर्यंत मेहकर तालुक्यातील १४0 शेततळय़ांचे काम पूर्ण झालेले आहे. या शेततळय़ांच्या माध्यमातून पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्यात आल्याने परिसरातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत हेच शेततळे किमान तीन वेळा पावसाच्या पाण्याने भरल्या जात असल्याने कमी-अधिक छत्तीस कोटी लीटर पाण्याची उपलब्धी होत आहे. यापैकी काही भागात पाणी जिरते, तर उर्वरित पाणी पावसाच्या खंडित कालावधीत शेती सिंचनासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा झाला आहे.

विहिराला रब्बी हंगामात पाणी कमी असते. या शेततळ्याचा फायदा झाला असून, रब्बी हंगामात तूर आणि हरभरा पिकाला संरक्षित सिंचनाचा फायदा यामुळे मिळाला.-अविनाश अर्जुन दुतोंडे, शेतकरी, उसरण.

शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. शेततळे ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी योजना ठरली आहे.- गणेश गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणा