शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मेहकर तालुक्यात शेततळ्यांमुळे १२ कोटी लीटर पाण्याची उपलब्धता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी ...

ठळक मुद्देसंरक्षित शेती सिंचनासाठी सोयशेततळी आणि शाश्‍वत सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकावर, तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांसाठी  ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यापूर्वी झालेला शेततळय़ांच्या कामामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाला असून, उत्पादनात काही प्रमाणात शाश्‍वतता आली आहे. आतापर्यंत मेहकर तालुक्यातील १४0 शेततळय़ांचे काम पूर्ण झालेले आहे. या शेततळय़ांच्या माध्यमातून पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्यात आल्याने परिसरातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत हेच शेततळे किमान तीन वेळा पावसाच्या पाण्याने भरल्या जात असल्याने कमी-अधिक छत्तीस कोटी लीटर पाण्याची उपलब्धी होत आहे. यापैकी काही भागात पाणी जिरते, तर उर्वरित पाणी पावसाच्या खंडित कालावधीत शेती सिंचनासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा झाला आहे.

विहिराला रब्बी हंगामात पाणी कमी असते. या शेततळ्याचा फायदा झाला असून, रब्बी हंगामात तूर आणि हरभरा पिकाला संरक्षित सिंचनाचा फायदा यामुळे मिळाला.-अविनाश अर्जुन दुतोंडे, शेतकरी, उसरण.

शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. शेततळे ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी योजना ठरली आहे.- गणेश गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणा