शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच द्या विसरण्याच्या सवयीकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:17 IST

वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे.

मुंबई : वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये विसरभोळेपणा आल्यास ही लक्षणे वेळीच ओळखण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. २१ सप्टेंबर या जागतिक अल्झायमर दिनाच्या निमित्ताने ही जनजागृती समाजाच्या विविध घटकांत होणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.स्मरणशक्ती व आकलनशक्तीशी प्रामुख्याने संबंधित असलेला ‘अल्झायमर’ हा आजार वृद्धावस्थेत संभवतो. हा आजार असाध्य असला तरी काही प्रतिबंधक उपायांनी तो होऊ नये यासाठी प्रयत्न करता येतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. तर याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, ६५ वर्षे वयानंतर २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे. या आजाराच्या पहिल्या टप्प्यात स्वत:चे नाव विसरण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नावीन्याबद्दल अनास्था वाटणे, विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते, असेही त्यांनी सांगितले.>कुटुंबीयांचे समुपदेशन महत्त्वाचे!याविषयी उपचार प्रक्रियेविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुशल भरवारे यांनी सांगितले, या आजारात मेंदूमध्ये अ‍ॅसिटिलकोलीन हे रसायन वाढविणारी औषधे दिले जाते. तसेच ग्लुटामेट हे रसायन कमी करणारी औषधेदेखील उपयोगी पडतात. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन हासुद्धा महत्त्वाचा भाग असतो. कारण त्यांच्या मनाची तयारी करणे, त्यांना आजाराविषयी शिकविणे, रुग्णाच्या मर्यादा समजून घेण्याची त्यांची क्षमता वाढविणे, याखेरीज रुग्णाची काळजी घेणाºया व्यक्तीला प्रशिक्षण देणे गरजेचे असते.घरामध्ये व्यवस्था व आखणी बदलणे- उदा. रुग्ण वस्तू कुठे ठेवल्यात ते विसरतो, म्हणून त्याच्या कपाटांना पाट्या लावणे. अशा सगळ्या उपचार पद्धतीमुळे ‘अल्झायमर’ या आजाराचे निदान जर लवकर होऊ शकले तर त्यावर उपचार करता येतो, यामुळे रुग्णाचा बुद्धीचा ºहास आपण रोखू शकतो व त्याचे आणि त्याच्या नातेवाइकांचे आयुष्य आपण सुकर करू शकतो.