शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

 ग्रामीण भागात 'कोरोना' खबरदारीवर लक्ष- संतोष शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:04 IST

खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

- सोहम घाडगे

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाबाबत जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे.  त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागात स्थलांतरीतांचे प्रमाण खुप मोठे आहे. त्यामुळे गावात येणाºया प्रत्येकाची नोंद  घेऊन खबरदारी घेतली जात आहे. खेड्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.

कोरोना प्रतिबंधासाठी महसूल प्रशासनाचे काय प्रयत्न सुरु आहे?

महसूल प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करीत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ ची वेळ दिली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यांवर महसूल पथकाकडून दंडात्मक कारवाई करणे सुरु आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्क वापरा, साबणाने नियमित हात धुवा, घराबाहेर पडू नका याबाबत महसूल प्रशासनाची सातत्याने जनजागृती सुरु आहे.

मोफत तांदुळ वाटप झाले का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तीन महिन्यांसाठी मोफत तांदुळ देण्याचे जाहीर केले आहे. अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे.  प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले. एप्रिल, मे व जून महिन्यासाठी मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थाही धान्य कीट वाटप करीत आहेत.

पारध येथे पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर काय उपाययोजना केल्या?

पारध हे गाव जालना जिल्ह्यात असले तरी बुलडाणा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेथे पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच  मराठवाड्याला जोडणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहे. अगदी पांदण रस्ते सुद्धा बंद केले आहेत. नाक्यावर तपासणी कडक करण्यात आली आहे. सैलानी येथील बेघर व त्यांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्वत: भेट देऊन तेथील परिस्थिती बघितली. खरच त्या लोकांची समस्या गंभीर आहे.पोटाला पोटभर जेवण त्यांना मिळाले पाहिजे. यासाठी सैलानी ट्रस्टला जेवण पुरविण्याच्या सूचना दिल्या. तेथील इतरही अडचणी सोडविण्यात येतील.

गरजूंच्या जेवणाची सोय कशी केली?

लॉकडाउन काळात संत गजानन महाराज संस्थान शेगावकडून गरजू नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सामान्य रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, क्वॉरंटीन केलेले, निर्वासित, बेघर, कर्तव्यावरील पोलिस, आरोग्य कर्मचाºयांना हे डबे पुरविले जातात. दररोज दोन वेळेसाठी जवळपास २ हजार डबे शहरात येतात. वाटपासाठी महसूल कर्मचारी, संस्थांची मदत होते. संकटाच्या काळात शेगाव संस्थानकडून मोठे  सेवा कार्य केले जात आहे. त्यांच्यामुळे गरजू, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. शेगाव संस्थानच्या सेवाकार्याला खरच तोड नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत