शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

कोरोना काळात अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न-  नरेश हेडाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:10 IST

पंतप्रधान पॅकेजअंतर्गतच्या उपाययोजना करण्यात येत असून आता त्याचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न होत असून यावर्षी महत्त्म असे पीक कर्ज आतापर्यंत शेतकºयांना वाटप केल्या गेले आहे तसेच पंतप्रधान पॅकेजअंतर्गतच्या उपाययोजना करण्यात येत असून आता त्याचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू झाला आहे. आत्मनिर्भर योजनेतंर्गतही अस्थायी विक्रेत्यांना कर्जवाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी दिली. अनुषंगीक विषयान्वेय त्यांची संवाद सादला असता एकंदर वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.

पंतप्रधान पॅकेज अंमलबजावणीची सध्याची स्थिती काय?पंतप्रधान पॅकेजअंतर्गत नियमीत खातेदारांना कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ज्यांनी कर्ज नाकारले आहे त्यांना देण्यात आले नाही. सध्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत दुसºया टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाली असून यात थकबाकीदार असलेल्यांना कर्ज देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पीक कर्ज वाटपाची स्थिती काय?जिल्ह्यात एकूण उदिष्ठाच्या ४३ टक्के रकमेचे पीककर्ज शेतकºयांना वाटप करण्यात आले असून पात्र शेतकºयांपैकी ६७ टक्के शेतकºयांना १,०४८ कोटी रुपयांचे आतापर्यंत पीक कर्ज वाटप झाले आहे. गेल्या चार वर्षातील हे महत्तम वाटप आहे.

कर्जमाफीची रक्कम किती शेतकºयांच्या खात्यात जमा झाली?  जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ५३५ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेले असून त्यांची यादी प्राप्त झाली आहे. पैकी १ लाख १२ हजार ८१९ शेतकºयांच्या खात्यात आतापर्यंत ८९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे मध्यंतरी लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्या कालावधीत काही शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण रखडले होते. आता ते पुर्ण करण्यात येत असून पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. सोबतच कर्जमाफीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचाही निपटारा करण्यात येत आहे.

केंद्राच्या आत्मनिर्भर योजनेची स्थिती? कोरोना मुळे अस्थायी अर्थात फेरिवाल्यांचा व्यवसाय अस्थिर झाला आहे. त्यांच्यासाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेतंर्गत दहा हजार रुपये व्याज अनुदान तत्वावर देण्यात येत आहे. पण काहींचे आधारकार्ड अपडेट नसल्यामुळे योजनेतंर्गत योजनेतंर्गत नोंदणी करताना अनेकांना अडचणी जात होत्या. त्यामुळे अनेकांनी आता आधारकार्ड वरील मोबाईल नंबर अपडेट केल्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी दुर झाल्या असून जळगाव जामोद तालुक्यातही योजनेचा लाभ अनेक फेरिवाल्यांना मिळाला.

 पुढील महिन्यात चालू आर्थिक वर्षाचे सहा महिने पूर्ण होतात. त्यानुषंगाने या सहा महिन्यात वार्षिक  पत आराखड्याची किती उदिष्टपुर्ती झाली याचा आढावा घेवून कृषी, गृहनिर्माण, शिक्षण, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील एकंदर पतपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेवू. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत दुसºया फेजमध्ये थकबाकीदार असलेल्यांना पुनर्वित्त पुरवठा करण्याची प्रक्रिया  सुरू आहे.- नरेश हेडाऊ

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रinterviewमुलाखतEconomyअर्थव्यवस्था